अक्कलकोट (प्रतिनिधी) – अक्कलकोट तालुक्यातील बादोले बुद्रुक येथील समर्थ सुभाष जानकर व श्रीकांत सुभाष जानकर यांनी नुकत्याच घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत समर्थ यांनी ५२० गुण घेऊन तर श्रीकांत जानकर यांनी ५६३ गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. बादोल्यासारख्या ग्रामीण भागातील एका सर्व सामान्य गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या या दोन्ही जानकर बंधुनी बादोले गावचे नाव तालुक्यात झळकाविले असून त्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यानी अभिनंदनाचा वर्षाव तसेच कौतुक केले आहे. एकाच घरातील दोन बंधू एकाचवेळेस नीट परीक्षेत यश मिळविण्याची किमया त्यांनी केले आहे. आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांनी हे यश संपादन केल्याबद्दल त्यांच्या आई आणि वडीलांना अत्यानंद झाला आहे. कठोर परीश्रम, वेळेचे बंधन, ध्येय, जिद्द, चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे सांगितले. आजच्या तरुणांनी मोबाईलकडे लक्ष न देता शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करुन आपल्या आई वडीलांचे तसेच कुटुंबाचे नाव लौकिक करावे असे आवाहन श्रीकांत व समर्थ जानकर यांनी केले.
More Related Articles
फिट इंडिया सायक्लोथॉन स्पर्धा
हिंगोली,(प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली संयुक्त विद्यमाने फिट…
बालिकेच्या गळ्यातील सोन्याचे पदक महिलांनी तोडले
नांदेड(प्रतिनिधी)-छत्रपती चौकात 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्यासुमारास एका लहान बालिकेच्या गळ्यातील सोन्याचे बनविलेले पदक…
2 फेबु्रवारी रोजी पाटीदार भवन समोर मरण पावलेल्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-2 फेबु्रवारी रोजी पाटीदार भवन येथे मरण पावलेल्या युवकाला मारहाण झाल्यामुळे तो मरण पावला या…
