जगातील महासत्ता आपापल्या हितासाठी निर्णय घेतात. कधी लोकशाहीच्या नावाखाली हस्तक्षेप होतो, कधी सुरक्षेच्या नावाखाली युद्ध सुरू होते. तेल, सत्ता आणि प्रभाव यांच्या भोवती फिरणाऱ्या या संघर्षात मानवी भावना मात्र कुठेतरी हरवतात. इतिहास सांगतो युद्धे नेहमी सरकारे सुरू करतात, पण त्याची किंमत सामान्य नागरिक भरतात.इराक असो किंवा इराण, प्रत्येक युद्धाने जगाला एकच प्रश्न विचारला आहे खरंच शांततेचा मार्ग इतका कठीण आहे का?
या संघर्षात पाकिस्तान आपली भूमिका मांडतो, इस्रायल स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतो, अमेरिका जागतिक नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक देशाला आपला निर्णय योग्य वाटतो. पण युद्धभूमीवर पडलेला सैनिक कोणत्या विचारसरणीचा असतो? तो फक्त कोणाचा तरी मुलगा, पती किंवा वडील असतो. भारतासारख्या मोठ्या देशाकडे जग आशेने पाहते. कधी शांत राहणे ही कूटनीती असते, तर कधी आवाज उठवणे ही जबाबदारी असते. लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात आपण जगाला शांततेचा संदेश देणारा देश आहोत की फक्त परिस्थिती पाहणारा साक्षीदार?

युद्धाच्या काळात एक आशेची किरणही दिसते. सामान्य नागरिक मदतीचे हात पुढे करतात. लहान मुले आपला खाऊ वाचवून युद्धग्रस्त मुलांसाठी मदत पाठवतात. धर्म, भाषा आणि सीमा विसरून माणुसकी जिवंत असल्याचा हा पुरावा आहे.युद्ध जिंकणारे नेते इतिहासात नोंदले जातात, पण युद्ध हरलेली माणसे इतिहासाच्या पानांवर दिसत नाहीत. उद्ध्वस्त शाळा, रिकामे घर, आईच्या डोळ्यातील पाणी आणि भीतीने थरथरणारे बालपण हीच युद्धाची खरी किंमत आहे.आज जगाला शस्त्रांपेक्षा संवादाची गरज आहे. कारण बंदुकीच्या आवाजाने शांतता निर्माण होत नाही; ती फक्त आणखी एका युद्धाची सुरुवात ठरते.
शेवटी प्रश्न एकच उरतो ..आपण जग जिंकण्याचा प्रयत्न करतो आहोत की मानवता वाचवण्याचा?
इराणी सैनिकांनी आपल्या क्षेपणास्त्र माझ्या जनतेला धन्यवाद लिहून ते क्षेपणास्त्र इजराइल वर टाकले आहेत. तसेच भारताच्या मुलांनी केलेल्या मदतीसाठी धन्यवाद दिले आहे इराणला मदत करणारे प्रत्येक जाती धर्मातील लोक आहेत.

