वसमत (प्रतिनिधी) – दिनांक २६ मार्च २०२६ रोजी आंबेडकरी चळवळीतील कविरत्न रंजन इंगोले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मागच्या वीस-पंचवीस वर्षांपासून त्यांनी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली आहे.ते संबंध महाराष्ट्रावर कविरत्न रंजन इंगोले या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचा अंत्यविधी बौद्ध समशानभूमी वसमत येथे दिनांक २६/०३/ २०२६ ठीक पाच वाजता करण्यात आला. यावेळी अंत्ययात्रेत रिपाइं (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटक विजयदादा सोनवणे, रिपाइं परभणी जिल्हाध्यक्ष डॉ. विजय गायकवाड, शाहीर आनंद किर्तने, प्रा. सुभाष मस्के, भिम टायगर सेनेचे विजय एंगडे, भास्कर गवळे यांच्यासह आदींनी यावेळी श्रध्दांजलीपर भावना व्यक्त केल्या. यावेळी रामचंद्र घोडके, उत्तम वाव्हेळे, दिलीप ठेंबरे, गौतम मोगले, सुभाष खेबाळे, डॉ. भुरे, प्रतिक सोनवणे, राहुल कसबे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील बहुसंख्य मान्यवरांची, नागरिक, महिलांची अंत्ययात्रेत सामील झाले होते.
More Related Articles
अवैध वाळू उत्खननाचा राक्षस: मूक युद्ध की उघड दहशत?
बिलोली (प्रतिनिधी)- जगभरात संघर्ष पेटलेले असताना, आपल्या भारत आणि महाराष्ट्र मध्ये एक वेगळंच युद्ध सुरू…
नांदेड शहर; शंभर दिवसांच्या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी कचरा व्यवस्थापनावरून सवाल-प्रतिसवाल
नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरातील शंभर दिवसांच्या विशेष विकास कार्यक्रमाच्या प्रारंभीच कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा ऐरणीवर आला…
उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार आजारी रजेवर असतांना प्रयागराज वारीपुर्ण करून काय मागितले असेल?
नांदेड(प्रतिनिधी)-आपली बदली झाल्यानंतर सुध्दा दीड वर्ष येथेच मुक्कामी असलेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांनी…
