वसमत (प्रतिनिधी) – दिनांक २६ मार्च २०२६ रोजी आंबेडकरी चळवळीतील कविरत्न रंजन इंगोले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मागच्या वीस-पंचवीस वर्षांपासून त्यांनी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली आहे.ते संबंध महाराष्ट्रावर कविरत्न रंजन इंगोले या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचा अंत्यविधी बौद्ध समशानभूमी वसमत येथे दिनांक २६/०३/ २०२६ ठीक पाच वाजता करण्यात आला. यावेळी अंत्ययात्रेत रिपाइं (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटक विजयदादा सोनवणे, रिपाइं परभणी जिल्हाध्यक्ष डॉ. विजय गायकवाड, शाहीर आनंद किर्तने, प्रा. सुभाष मस्के, भिम टायगर सेनेचे विजय एंगडे, भास्कर गवळे यांच्यासह आदींनी यावेळी श्रध्दांजलीपर भावना व्यक्त केल्या. यावेळी रामचंद्र घोडके, उत्तम वाव्हेळे, दिलीप ठेंबरे, गौतम मोगले, सुभाष खेबाळे, डॉ. भुरे, प्रतिक सोनवणे, राहुल कसबे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील बहुसंख्य मान्यवरांची, नागरिक, महिलांची अंत्ययात्रेत सामील झाले होते.
More Related Articles
आरक्षण बचावासाठी आदीवासी धडकले नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर
नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने 3 सप्टेंबर रोजी काढलेल्या जी.आर.मध्ये हैद्राबाद गॅझेटच्या आधाराने अनुसूचित जमातीत बंजारा आणि धनगर…
प्रताप गायकवाड हत्या प्रकरण; सहा नव्या आरोपींना अटक ;आठ जणांना २ मे पर्यंत पोलीस कोठडी
नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील पूर्णा रोडवरील नदी परिसरात घडलेल्या प्रताप दत्ता गायकवाड (वय 26) हत्या…
धर्माबाद येथे दोन दिवसांपुर्वी दाखल झालेल्या मारहाण प्रकरणात काऊंटर गुन्हा दाखल
नांदेड (प्रतिनिधी)-धर्माबाद येथे 23 ऑक्टोबर येथे झालेल्या मारहाण संदर्भात काऊंटर गुन्हा दाखल झाला आहे. या…
