वसमत (प्रतिनिधी) – दिनांक २६ मार्च २०२६ रोजी आंबेडकरी चळवळीतील कविरत्न रंजन इंगोले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मागच्या वीस-पंचवीस वर्षांपासून त्यांनी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली आहे.ते संबंध महाराष्ट्रावर कविरत्न रंजन इंगोले या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचा अंत्यविधी बौद्ध समशानभूमी वसमत येथे दिनांक २६/०३/ २०२६ ठीक पाच वाजता करण्यात आला. यावेळी अंत्ययात्रेत रिपाइं (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटक विजयदादा सोनवणे, रिपाइं परभणी जिल्हाध्यक्ष डॉ. विजय गायकवाड, शाहीर आनंद किर्तने, प्रा. सुभाष मस्के, भिम टायगर सेनेचे विजय एंगडे, भास्कर गवळे यांच्यासह आदींनी यावेळी श्रध्दांजलीपर भावना व्यक्त केल्या. यावेळी रामचंद्र घोडके, उत्तम वाव्हेळे, दिलीप ठेंबरे, गौतम मोगले, सुभाष खेबाळे, डॉ. भुरे, प्रतिक सोनवणे, राहुल कसबे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील बहुसंख्य मान्यवरांची, नागरिक, महिलांची अंत्ययात्रेत सामील झाले होते.
More Related Articles
अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार
प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन नांदेड – सन 2025-26 या वर्षासाठी कल्याणकारी…
विष्णुपूरी प्रकल्पाचे 15 दरवाजे उघडले; पुर परिस्थितीचा संभाव्य धोका
नांदेड(प्रतिनिधी)-मागील चार दिवसापासून राज्यात पावसाने अक्षरशाः धुमाकुळ घातला. पुढील 48 तासात अनेक भागात जोरदार पाऊस…
दिखाऊ सन्मान नको! शंकराचार्यांचा सरकारला ठाम नकार, माघमेळा परिसराचा त्याग
शंकराचार्यांच्या स्नानालाही एसओपी? प्रशासनाच्या भूमिकेवर कठोर सवाल १९ जानेवारी, मौनी अमावस्या. त्या दिवसापासून प्रयागराज येथील…
