वसमत (प्रतिनिधी) – दिनांक २६ मार्च २०२६ रोजी आंबेडकरी चळवळीतील कविरत्न रंजन इंगोले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मागच्या वीस-पंचवीस वर्षांपासून त्यांनी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली आहे.ते संबंध महाराष्ट्रावर कविरत्न रंजन इंगोले या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचा अंत्यविधी बौद्ध समशानभूमी वसमत येथे दिनांक २६/०३/ २०२६ ठीक पाच वाजता करण्यात आला. यावेळी अंत्ययात्रेत रिपाइं (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटक विजयदादा सोनवणे, रिपाइं परभणी जिल्हाध्यक्ष डॉ. विजय गायकवाड, शाहीर आनंद किर्तने, प्रा. सुभाष मस्के, भिम टायगर सेनेचे विजय एंगडे, भास्कर गवळे यांच्यासह आदींनी यावेळी श्रध्दांजलीपर भावना व्यक्त केल्या. यावेळी रामचंद्र घोडके, उत्तम वाव्हेळे, दिलीप ठेंबरे, गौतम मोगले, सुभाष खेबाळे, डॉ. भुरे, प्रतिक सोनवणे, राहुल कसबे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील बहुसंख्य मान्यवरांची, नागरिक, महिलांची अंत्ययात्रेत सामील झाले होते.
More Related Articles
विवाहितेला 25 लाखांची मागणी
नांदेड (प्रतिनिधी)-एका विवाहितेला 25 लाखाचा हुंडा मागणाऱ्या तिच्या सासरच्या मंडळीला 5 लाख रुपये दिल्यानंतर सुध्दा…
.. आणि पत्नीने आपल्या पतीचा खून केला
नांदेड(प्रतिनिधी)- एका महिलेने आपले अनैतिक संबंध सुरू राहावेत या उद्देशाने त्या उद्देशात अडसळ ठरणाऱ्या आपल्या…
‘स्वारातीम’ विद्यापीठातील ६ कर्मचारी सेवानिवृत्त
नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शैक्षणिक (संलग्निकरण) विभागाचे अधीक्षक संजयकुमार नरहरराव गाजरे, स्थावर…
