वसमत (प्रतिनिधी) – दिनांक २६ मार्च २०२६ रोजी आंबेडकरी चळवळीतील कविरत्न रंजन इंगोले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मागच्या वीस-पंचवीस वर्षांपासून त्यांनी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली आहे.ते संबंध महाराष्ट्रावर कविरत्न रंजन इंगोले या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचा अंत्यविधी बौद्ध समशानभूमी वसमत येथे दिनांक २६/०३/ २०२६ ठीक पाच वाजता करण्यात आला. यावेळी अंत्ययात्रेत रिपाइं (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटक विजयदादा सोनवणे, रिपाइं परभणी जिल्हाध्यक्ष डॉ. विजय गायकवाड, शाहीर आनंद किर्तने, प्रा. सुभाष मस्के, भिम टायगर सेनेचे विजय एंगडे, भास्कर गवळे यांच्यासह आदींनी यावेळी श्रध्दांजलीपर भावना व्यक्त केल्या. यावेळी रामचंद्र घोडके, उत्तम वाव्हेळे, दिलीप ठेंबरे, गौतम मोगले, सुभाष खेबाळे, डॉ. भुरे, प्रतिक सोनवणे, राहुल कसबे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील बहुसंख्य मान्यवरांची, नागरिक, महिलांची अंत्ययात्रेत सामील झाले होते.
More Related Articles
डॉ.सुधीर देशमुख यांना मातृशोक
नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई भास्करराव…
मोटार सायकल आडवून मोबाईल लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर ते भोकर रस्त्यावर अज्ञातांनी प्रल्हाद मिरासे व त्यांचे साथीदार हिमायतनगरकडून भोकरकडे जात असतांना अज्ञातांनी…
विकसित नांदेड करण्यासाठी झटणार – महापौर कविता मूळे
नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या १०० दिवसांच्या…
