वसमत (प्रतिनिधी) – दिनांक २६ मार्च २०२६ रोजी आंबेडकरी चळवळीतील कविरत्न रंजन इंगोले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मागच्या वीस-पंचवीस वर्षांपासून त्यांनी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली आहे.ते संबंध महाराष्ट्रावर कविरत्न रंजन इंगोले या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचा अंत्यविधी बौद्ध समशानभूमी वसमत येथे दिनांक २६/०३/ २०२६ ठीक पाच वाजता करण्यात आला. यावेळी अंत्ययात्रेत रिपाइं (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटक विजयदादा सोनवणे, रिपाइं परभणी जिल्हाध्यक्ष डॉ. विजय गायकवाड, शाहीर आनंद किर्तने, प्रा. सुभाष मस्के, भिम टायगर सेनेचे विजय एंगडे, भास्कर गवळे यांच्यासह आदींनी यावेळी श्रध्दांजलीपर भावना व्यक्त केल्या. यावेळी रामचंद्र घोडके, उत्तम वाव्हेळे, दिलीप ठेंबरे, गौतम मोगले, सुभाष खेबाळे, डॉ. भुरे, प्रतिक सोनवणे, राहुल कसबे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील बहुसंख्य मान्यवरांची, नागरिक, महिलांची अंत्ययात्रेत सामील झाले होते.
More Related Articles
डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी गोरठा येथे ४थे साहित्य संमेलन
नांदेड : उमरी तालुक्यातील गोरठा येथे संवेदनशील लेखिका कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या अध्यक्षतेखाली चौथे…
एकलव्य निवासी इंग्रजी शाळेसाठी 23 फेब्रुवारीला प्रवेश पूर्व परीक्षा
नांदेड :- इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशाकरीता रविवार 23 फेब्रुवारी 2025 रोजी स्पर्धा…
मतदानाच्या दिवशी वंचितच्या उमेदवाराचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या पोलींग एजंटला मतदान केंद्रात प्रवेश दिला नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर…
