वसमत (प्रतिनिधी) – दिनांक २६ मार्च २०२६ रोजी आंबेडकरी चळवळीतील कविरत्न रंजन इंगोले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मागच्या वीस-पंचवीस वर्षांपासून त्यांनी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली आहे.ते संबंध महाराष्ट्रावर कविरत्न रंजन इंगोले या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचा अंत्यविधी बौद्ध समशानभूमी वसमत येथे दिनांक २६/०३/ २०२६ ठीक पाच वाजता करण्यात आला. यावेळी अंत्ययात्रेत रिपाइं (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटक विजयदादा सोनवणे, रिपाइं परभणी जिल्हाध्यक्ष डॉ. विजय गायकवाड, शाहीर आनंद किर्तने, प्रा. सुभाष मस्के, भिम टायगर सेनेचे विजय एंगडे, भास्कर गवळे यांच्यासह आदींनी यावेळी श्रध्दांजलीपर भावना व्यक्त केल्या. यावेळी रामचंद्र घोडके, उत्तम वाव्हेळे, दिलीप ठेंबरे, गौतम मोगले, सुभाष खेबाळे, डॉ. भुरे, प्रतिक सोनवणे, राहुल कसबे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील बहुसंख्य मान्यवरांची, नागरिक, महिलांची अंत्ययात्रेत सामील झाले होते.
More Related Articles
मारहाण करून 20 हजार रुपये लुटले
नांदेड(प्रतिनिधी)-काकांडी येथील एका व्यक्तीला 1 जानेवारी रोजी वसंतराव चौकातील पुतळ्यासमोरच्या रस्त्यावर मारहाण करून 20 हजार…
स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेसाठी;30 जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याची मुदत जाहीर नांदेड – मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने…
नांदेड बस स्थानकावर थरार: पोलिसांसमोरच १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या
नांदेड (प्रतिनिधी)- सोमवार, 13 जुलै 2026 च्या मध्यरात्री नांदेड बस स्थानकावर एका १७ वर्षीय अल्पवयीन…
