मुंबई (प्रतिनिधी)- राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे. राज्य सरकारने महागाई भत्त्याच्या (DA) थकबाकीच्या रकमेबाबत शासन निर्णय जारी केला असून नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील थकबाकी मे 2026 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.वित्त विभागाने 18 मे 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सातव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. यापूर्वी 25 फेब्रुवारी 2026 रोजी महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.सरकारच्या आदेशानुसार, जुलै ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी आधीच देण्यात आली असून उर्वरित नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील थकबाकी आता थेट वेतनासोबत रोख स्वरूपात जमा केली जाणार आहे.या निर्णयामुळे राज्यातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या हातात अतिरिक्त रक्कम येणार आहे. संबंधित खर्च नियमित वेतन व भत्त्यांच्या तरतुदीतून भागविण्यात येणार असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे.
More Related Articles
लोकशाही की स्क्रिप्टेड नाटक? संसदेत हल्ल्याचा गाजावाजा की राजकीय खेळी!
काल लोकसभेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायंकाळी पाच वाजता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करायचे होते.…
भारतात माजी राज्यपालाविरुध्द पहिले दोषारोपपत्र दाखल
जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलीक यांची 78 व्या वर्षात वाट लावण्याचा प्रकार सुरू झाला.…
सचखंड गुरुद्वारा बोर्ड कायदा 1956 मध्ये बदल करताना विचारात घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबी
नांदेड – महाराष्ट्र शासनाने सचखंड गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 1956 मध्ये व्यापक बदल करण्याचा निर्णय घेतल्याची…
