भगर हा उपवासाचा पदार्थ खात्यांना काळी घ्या-जिल्हा प्रशासन

 

नांदेड(प्रतिनिधी)-उद्या महाशिवराती पर्वावर उपासाच्या जेवनामध्ये भगर हा पदार्थ महत्वाचा आहे. पण त्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे अनेक विषारी द्रव्य तयार होतात. म्हणून भगर खातांना काही काळी घेण्याची सुचना जिल्हा प्रशासनाने जारी केली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या स्वाक्षरीने प्रसिध्दीसाठी पाठविलेल्या पत्रकात उपासासाठी भगर या पदार्थाचे सेवन केले जाते. भगर खाल्यामुळे महाराष्ट्रात व नांदेड जिल्ह्यात अनेक वाईट घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये अस्परजिलस प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे फ्युमीगाक्लेविन सारखी विषद्रव्य तयार होतात. म्हणून भगर खातांना काही काळजी घेण्यास सांगितले आहे.
बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतो पाकिट बंद भगर घ्या. ब्रॅन्ड नाव नसलेली किंवा लेबल नसलेली पाकिटे आणि सुटी भगर खरेदी करू नका. भगर खरेदी करतांना पाकिटावरील पॅकींग दिनांक व वापराचा अंतिम दिनांक तपासा. भगर साठवतांना ती कोरड्या ठिकाणी, व्यवस्थीत झाकन बंद डब्यात ठेवा. जेणे करून वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची लागण होणार नाही. भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खा. भगरीचे पिठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पिठ साठवू नका. बाहेरून दळून आणण्याऐवजी घरीच दळा. भगर आणि शेंगदाने हे अधिक प्रथीनयुक्त पदार्थ आहेत. दोन- ते तीन दिवस सलग उपवास असतांना या पदार्थांचे सेवन ऍसीडीटी वाढविण्यास कारण ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ आणि पोटाचे त्रास होतात. या पदार्थांचे सेवन पचन शक्तीनुसार मर्यादीत ठेवावे.
भगर विक्र्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना सुध्दा काही सुचना देण्यात आल्या आहेत. त्यात विक्रेत्यांनी पॅकबंद भगरच विक्री करावे, भगर खरेदी करतांना धाऊक विक्रेत्यांकडून पावती घ्यावी. भगरचे पाकिट, पोत्यावर उत्पादकाचा पत्ता, परवाना क्रमांक, पॅकींग दिनांक, वापराचा अंतिम दिनांक असल्याची खात्री करून विक्री करावी. मुदत बाह्य भगर किंवा भगर पिठ विक्री करू नये. सुट्टे भगर व खुले भगर पिठ विक्री करू नये. अन्न व औषधी प्रशासनाच्यावतीने भगर विक्री करणाऱ्या दुकानदारांची तपासणी करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.
जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या या प्रेसनोटप्रमाणे उद्या महाशिवरात्र हा सण साजरा होणार आहे. या दिवशीसुध्दा असंख्य लोक उपवास करतात सध्या फेबु्रवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आहे. त्यामुळे उन्हाळा जानवू लागला आहे. परंतू हे प्रेसनोट जारी करतांना ऑक्टोबर महिन्यातील तापमानाचा उल्लेख करून ऑक्टोबर महिन्याच्या तापमानातील आर्द्रता बुरशी वाढीसाठी अनुकूल असते असे लिहिलेले आहे. याचा प्रभाव फेबु्रवारीमध्ये पण पडतो काय असा प्रश्न प्रेसनोट वाचतांना येतो. कारण सध्या तर उन्हाळा जाणवायला सुरू झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!