नांदेड- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजे १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. बालदिनाचे औचित्य साधून लोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पेनूर हायस्कूलमध्ये शालेय बालकविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कविसंमेलनात येथील बालकवी पंडित पाटील बेरळीकर, ज्येष्ठ कवी गजानन हिंगमिरे, सुप्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ज्येष्ठ कवयित्री उषाताई ठाकूर, प्रथितयश लेखिका रुपाली वागरे वैद्य आदी साहित्यिक कवी कवयित्री तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. या कविसंमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.
More Related Articles
ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांची नांदेड येथे शुक्रवारी जाहीर सभा
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड लोकसभा मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाश उर्फ…
मंत्रालय की सचिवालय ?
कालच्या दोन बातम्यांचा परस्पर संबंध आहे. काल झालेल्या कॅबिनेटमध्ये मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे…
संभाव्य काळात पाणी व चारा टंचाई भासणार नाही याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड- जिल्ह्यात उन्हाळ्याच्या संभाव्य काळात पाणीटंचाई व जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी संबंधित विभागानी…
