नांदेड- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजे १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. बालदिनाचे औचित्य साधून लोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पेनूर हायस्कूलमध्ये शालेय बालकविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कविसंमेलनात येथील बालकवी पंडित पाटील बेरळीकर, ज्येष्ठ कवी गजानन हिंगमिरे, सुप्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ज्येष्ठ कवयित्री उषाताई ठाकूर, प्रथितयश लेखिका रुपाली वागरे वैद्य आदी साहित्यिक कवी कवयित्री तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. या कविसंमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.
More Related Articles
आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना प्रशिक्षण
नांदेड – आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या…
पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे यांच्या निलंबन आदेशाची प्रक्रिया योग्यच
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण येथील पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे यांना निलंबित केल्याच्या आदेशावर तारखांमध्ये असलेला घोळ हा…
नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडी मार्गे लातूर-पुणे विशेष गाडी
नांदेड-दिवाळी आणि छट निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड-पनवेल-नांदेड विशेष…
