नांदेड- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजे १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. बालदिनाचे औचित्य साधून लोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पेनूर हायस्कूलमध्ये शालेय बालकविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कविसंमेलनात येथील बालकवी पंडित पाटील बेरळीकर, ज्येष्ठ कवी गजानन हिंगमिरे, सुप्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ज्येष्ठ कवयित्री उषाताई ठाकूर, प्रथितयश लेखिका रुपाली वागरे वैद्य आदी साहित्यिक कवी कवयित्री तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. या कविसंमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.
More Related Articles
डॉ.गितांजली क्षीरामेला मारहाण करून शिवाजी जाधवने मागितली 1 कोटीची खंडणी
नांदेड(प्रतिनिधी)-पावडेवाडी येथे एका महिला डॉक्टराला डोक्याला गंभीर दु:खापत करून, काही साहित्य बळजबरीने चोरून नेले आणि…
नांदेड येथे शीख समाजातील ज्येष्ठ नागरिक सरदार चरणसिंघ संधू यांचे निधन
नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील शीख समाजातील ज्येष्ठ नागरिक सरदार चरणसिंघ सोहनसिंघ संधू (वय 70 वर्षे)…
नांदेडमध्ये बिहारसारखी गुन्हेगारी? भरदिवसा रस्त्यावर मारहाण, जबरदस्तीने घेतली रजिस्ट्री
नांदेड,(प्रतिनिधी)- काल, दिनांक 25 जुलै 2025 रोजी दुपारी नांदेडमधील आयटीआय समोरच्या रस्त्यावरील मधुर भोज समोर…
