नांदेड- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजे १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. बालदिनाचे औचित्य साधून लोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पेनूर हायस्कूलमध्ये शालेय बालकविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कविसंमेलनात येथील बालकवी पंडित पाटील बेरळीकर, ज्येष्ठ कवी गजानन हिंगमिरे, सुप्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ज्येष्ठ कवयित्री उषाताई ठाकूर, प्रथितयश लेखिका रुपाली वागरे वैद्य आदी साहित्यिक कवी कवयित्री तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. या कविसंमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.
More Related Articles
डुकरे पकडण्याची मशीन न विचारता का नेली यासाठी खून
नांदेड(प्रतिनिधी)- डुकरे पकडण्याची मशीन न विचारता कशी घेवून गेला म्हणून एका व्यक्तीच्या खून करण्यात आला…
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नावीण्यपूर्ण उपक्रम गरजेचे-अप्पर जिल्हाधिकारी पी.एस. बोरगावकर
नांदेड –शिक्षण हा महत्त्वाचा विषय असून विद्यार्थी घडविण्याचे व समाजाच्या सर्वागीण विकासासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही.…
इतरांना पोलीस कोठडी मागणारे पोलीस उपनिरिक्षक स्वत:च पोलीस कोठडीत
नांदेड(प्रतिनिधी)-3 लाख रुपयांची लाच मागणी करून 1 लाख रुपयांची लाच स्विकारणाऱ्या पोलीस उपनिरिक्षकास लाच देण्यास…
