नांदेड- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजे १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. बालदिनाचे औचित्य साधून लोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पेनूर हायस्कूलमध्ये शालेय बालकविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कविसंमेलनात येथील बालकवी पंडित पाटील बेरळीकर, ज्येष्ठ कवी गजानन हिंगमिरे, सुप्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ज्येष्ठ कवयित्री उषाताई ठाकूर, प्रथितयश लेखिका रुपाली वागरे वैद्य आदी साहित्यिक कवी कवयित्री तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. या कविसंमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.
More Related Articles
चिकन, अंडी खाणे शंभर टक्के सुरक्षित ;नांदेडमध्ये बर्ड फ्लूची लागण नाही
• *कोणत्याही अफवांना बळी पडू नका* • *पशुसंवर्धन विभागाचे नागरिकांना आवाहन* नांदेड :- बर्डफ्लू आजारासंदर्भात…
शिवाजी नगर पोलीस ठाण्यातून पळून गेलेला आरोपी पुन्हा काही तासातच पोलिसांच्या ताब्यात
नांदेड (प्रतिनिधी) – शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यातील तीन आरोपींपैकी दोघांनी पोलिसांच्या नजरेतून पळ काढल्याची घटना समोर…
जिल्हा पोलीस दलातून एक श्रेणी पोलीस उपनिरिक्षक आणि एक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सेवानिवृत्त
नांदेड(प्रतिनिधी)-नोव्हेंबर महिन्यात नांदेड जिल्हा पोलीस दलातून एक श्रेणी पोलीस उपनिरिक्षक आणि एक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक…
