आज अनेक लोक पाश्चात्य संस्कृतीच्या दिशेने धावत आहेत.
चमक-दमक, फॅशन आणि,आधुनिकतेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
*पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे*
*सूर्य जेव्हा पश्चिमेकडे जातो, तेव्हा तो मावळतो.*
*त्याचप्रमाणे, आपला समाज जर पाश्चात्य अंधानुकरणात हरवला,*
*तर आपली ओळख, आपली मुळे आणि आपला आत्मा हरवेल.*
*परंतु अभिमानाची गोष्ट म्हणजेआजही आपल्या भारतात असे असंख्य लोक आहेत*
*जे आपल्या संस्कृती, परंपरा आणि मूल्यांना जिवापाड जपत आहेत.हेच लोक या महान संस्कृतीचे खरे रक्षक आहेत.*
*आपली भारतीय संस्कृती ही केवळ पोशाख, सण किंवा रीतिरिवाजांपुरती मर्यादित नाही,*
*ती एक जीवनदर्शन आहे* *जी सत्य,करुणा, अहिंसा, आदर आणि कुटुंबबंध या पायाावर उभी आहे.*
*ही संस्कृती आपल्याला शिकवते की खरी प्रगती भौतिक संपत्तीत नाही,*
*तर चरित्र, सेवा आणि सच्च्या कर्मात आहे.*
*आजकालचा काळ बदलत चालला आहे*
*कपड्यांमध्ये अंगप्रदर्शन आणि उघडेपणाची होड वाढत आहे,*
*तरुण-तरुणींचे एकमेकांप्रती आकर्षण मर्यादेच्या सीमारेषा ओलांडत आहे.*
*हे आकर्षण क्षणिक आहे, पण त्याचे दुष्परिणाम संपूर्ण समाजावर उमटतात.*
*जिथे कधी संकोच आणि संस्कार हे अभिमानाचे प्रतीक होते,*
*तिथे आज फॅशन आणि दिखावा यांनी संस्कृतीचा गाभा हादरवला आहे.*
*त्याहूनही दुःखद गोष्ट म्हणजे*
*आजची तरुण पिढी मोठ्यांचा सन्मान विसरत चालली आहे,*
*आई-वडिलांची सेवा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा भाव कमी होत चालला आहे.*
*ज्या संस्कृतीने आपल्याला “मातृदेवो भव, पितृदेवो भव” असा दिव्य संदेश दिला,*
*त्याच संस्कृतीत आज आई-वडील वृद्धाश्रमात पोहोचत आहेत*
*ही केवळ एका कुटुंबाची नव्हे, तर समाजाची हार आहे.*
*पण आपण विसरू नये की जोपर्यंत भारतीय संस्कृतीचा दीप आपल्या अंतःकरणात प्रज्वलित आहे,*
*तोपर्यंत अंधार कितीही गडद असला तरीही ही संस्कृती कधीच मावळणार नाही.*
*हो, आजची तरुण पिढी पाश्चात्यतेकडे आकर्षित होत आहे,*
*परंतु जेव्हा त्यांना जीवनाचा खरा अर्थ उमजेल,*
*तेव्हा ते पुन्हा परत येतील त्या संस्कृतीच्या कुशीत*
*जिथे आईची माया, वडिलांचे आशीर्वाद, गुरूचा सन्मान आणि मर्यादेचे मूल्य जपले जाते.*
*आपली संस्कृती हा भूतकाळ नाही,तर सजीव चेतना आहे*
*जी प्रत्येक मंदिराच्या घंटीत, प्रत्येक वेदाच्या मंत्रात,प्रत्येक कुटुंबाच्या प्रार्थनेत आणि प्रत्येक बालकाच्या निरागसतेत आजही धडकत आहे.*
*जो आपल्या मुळांशी जोडलेला आहे,*
*त्याला कोणतीही वादळे, आकर्षणे किंवा प्रलोभने डगमगवू शकत नाहीत.*
*आपली भारतीय संस्कृती सदैव अमर राहील,*
*कारण ती धर्म नव्हे तर जीवनाचा सार आहे.*
*भारतीय राहणे, हीच खरी प्रगती आहे!*
*✍️राजेंद्र सिंघ शाहू
7700063999 इलेक्ट्रिकल ट्रैनंर, नांदेड*
