खा.राहुल गांधीचा खाजगी दौरा’ की ‘खलबत रणनीती’? मलेशियातून उपराष्ट्रपती निवडणुकीवर परिणाम?

राहुल गांधी यांच्या मलेशिया दौऱ्यातील छायाचित्रांचे प्रसारण करून भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण केला. यासोबतच, रविशंकर प्रसाद आणि गोदी मीडियातील सुशांत सिन्‍हा व रुबिका लियाकत यांनी राहुल गांधींच्या दौऱ्यावर तासन्‌तास चर्चा केली.प्रश्न असा आहे की, त्यांच्यावर इतकी चर्चा करण्याची गरज होती काय? राहुल गांधी भारताचे पंतप्रधान नाहीत. ते भारत सरकारच्या खर्चावर मलेशियात गेलेले नाहीत. मग त्यांच्या खासगी दौऱ्यावर इतकी चर्चा का? ते स्वतःच्या खर्चाने, आपल्या कामासाठी, विश्रांतीसाठी किंवा सुट्टीसाठी गेले असतील. ते त्यांचे वैयक्तिक कारण आहे.

आज दुपारी फोर पीएम चॅनेलवरील अदितीने एक मोठा खुलासा केला. तिच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधींसोबत मलेशियात TDP व अन्य पक्षांचे सुमारे आठ खासदार देखील उपस्थित होते. त्यामुळे असा संशय व्यक्त केला जात आहे की, १५व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भातील काही हालचाली राहुल गांधींनी मलेशियातूनच केल्या काय?

 

सध्या संसदेत मतदान सुरू आहे. हे मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालेल. त्यानंतर सहा वाजेपासून मतमोजणी सुरू होईल आणि सात वाजता अंतिम निकाल जाहीर होईल.दरम्यान, संसदेत मतदानासाठी जाताना नितीन गडकरी व काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचे एकत्र चालतानाचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. दोघे एकमेकांचा हात धरून चालताना दिसले. हे छायाचित्र वेगवेगळे संकेत देत आहे.

 

राहुल गांधी सध्या मलेशियातील लंकावी येथे असल्याचे दोन फोटोंमुळे स्पष्ट झाले. हे फोटो अमित मालवीय यांनी प्रसिद्ध केले. ते भाजपच्या सोशल मीडिया प्रचार विभागाचे प्रमुख आहेत आणि त्यांचे काम राहुल गांधींना वाईट दाखवण्याचे आहे, असे स्पष्ट दिसते.

फोटो प्रसिद्ध होताच सुशांत सिन्हा आणि रुबिका लियाकत यांनी राहुल गांधींच्या दौऱ्यावर मोठमोठे कार्यक्रम तयार केले, चर्चासत्रे घडवली. मात्र, हा दौरा त्यांच्या खासगी खर्चावर होता. भारत सरकारने कोणतीही अधिकृत बुकिंग किंवा सुविधा दिलेली नव्हती. ते तिथे स्कूटीवर फिरताना दिसले आणि त्यावरूनही टीका झाली. त्यांच्या कपड्यांवर, अगदी चड्डीवरूनही आक्षेप घेतले गेले.हे पाहता असं वाटतं की, राहुल गांधींना कोणतंही स्वातंत्र्य नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. त्यांच्या दौऱ्याबाबत “गुप्त बैठक” झाली का, “गुप्तहेरांशी चर्चा” झाली का, अशा चर्चा मुद्दाम उकरून काढल्या जात आहेत.परंतु या साऱ्या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे, राहुल गांधींच्या सुरक्षेला यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या वडिलांची (राजीव गांधी) आणि आजीची (इंदिरा गांधी) हत्या झालेली आहे. अशा परिस्थितीत सरकारला माहिती असलेल्या दौऱ्याची माहिती फोटोंच्या माध्यमातून चोरीछुपे प्रसारित केली जाते, यावरून माहिती लीक करणाऱ्यांची नियत स्पष्ट होते.

 

आज सकाळी १५व्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली. एनडीएतर्फे सी.पी. राधाकृष्णन, तर INDIA आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी हे दोन प्रमुख उमेदवार आहेत. दोघांनीही खासदारांशी संपर्क साधून समर्थन मागितले.मात्र, भाजपने काही राजकीय पक्षांवर दबाव आणल्याचे सांगितले जाते, त्यामुळे काही पक्षांनी मतदानात भाग घेण्याचा निर्णय बदलला.

 

एक आश्चर्यकारक दृश्य समोर आले, एक दरवाजातून मल्लिकार्जुन खरगे, आणि दुसऱ्या दरवाजातून नितीन गडकरी एकमेकांचा हात धरून मतदान कक्षात जाताना दिसले. हे सुमारे ३५ सेकंदांचे व्हिडीओ फुटेज चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती दिसली नाही, की हात धरल्यामुळे काही परिणाम होईल याची चिंता दिसली नाही. त्यामुळे अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.

 

अदितीच्या खुलाशानुसार, राहुल गांधींसोबत आठ खासदार मलेशियात होते, हे लक्षात घेतल्यास, हा दौरा केवळ वैयक्तिक सुट्टीसाठी नव्हता, तर काही राजकीय हालचालींचा भाग असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. आणि या हालचालींचा परिणाम आजच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरही होतोय का, यावर चर्चा सुरू आहे.मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजल्यापासून मतमोजणी होईल आणि सात वाजेपर्यंत निकाल जाहीर होईल.परंतु राहुल गांधींचा मलेशिया दौरा सध्या सत्ताधाऱ्यांसाठी एक मोठा राजकीय खळबळ ठरत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!