वसमत (प्रतिनिधी) – दिनांक २६ मार्च २०२६ रोजी आंबेडकरी चळवळीतील कविरत्न रंजन इंगोले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मागच्या वीस-पंचवीस वर्षांपासून त्यांनी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली आहे.ते संबंध महाराष्ट्रावर कविरत्न रंजन इंगोले या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचा अंत्यविधी बौद्ध समशानभूमी वसमत येथे दिनांक २६/०३/ २०२६ ठीक पाच वाजता करण्यात आला. यावेळी अंत्ययात्रेत रिपाइं (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटक विजयदादा सोनवणे, रिपाइं परभणी जिल्हाध्यक्ष डॉ. विजय गायकवाड, शाहीर आनंद किर्तने, प्रा. सुभाष मस्के, भिम टायगर सेनेचे विजय एंगडे, भास्कर गवळे यांच्यासह आदींनी यावेळी श्रध्दांजलीपर भावना व्यक्त केल्या. यावेळी रामचंद्र घोडके, उत्तम वाव्हेळे, दिलीप ठेंबरे, गौतम मोगले, सुभाष खेबाळे, डॉ. भुरे, प्रतिक सोनवणे, राहुल कसबे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील बहुसंख्य मान्यवरांची, नागरिक, महिलांची अंत्ययात्रेत सामील झाले होते.
More Related Articles
27 पोलीस उपअधिक्षकांना गणपती आगमनापुर्वी नवीन पदस्थापना
नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने 17 पोलीस निरिक्षकांना पदोन्नती देवून त्यांना पोलीस उपअधिक्षक पदावर नवीन नियुक्त्या दिल्या आहेत.…
28 वर्षीय युवकाची आत्महत्या
नांदेड (प्रतिनिधी)- शहराच्या सुमेधनगर येथील एका 28 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. भाग्यनगर…
MoonWin Gambling enterprise Added bonus Requirements, Current Promos & Review 2024
Without needing a devoted app, the new gambling enterprise’s web site is actually completely receptive,…
