नांदेड- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजे १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. बालदिनाचे औचित्य साधून लोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पेनूर हायस्कूलमध्ये शालेय बालकविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कविसंमेलनात येथील बालकवी पंडित पाटील बेरळीकर, ज्येष्ठ कवी गजानन हिंगमिरे, सुप्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ज्येष्ठ कवयित्री उषाताई ठाकूर, प्रथितयश लेखिका रुपाली वागरे वैद्य आदी साहित्यिक कवी कवयित्री तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. या कविसंमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.
More Related Articles
किनवट येथे चोरट्यांनी चार दुकाने फोडली
नांदेड(प्रतिनिधी)-किनवट येथे चार दुकाने फोडून चोरट्यांनी 1 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्याचा प्रकार…
20 वर्षीय युवकाला मारहाण करून लुटले
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बळीरामपुर येथे एका 20 वर्षीय युवकाला मारहाण करून त्याच्या खिशातील…
नांदेड जिल्हा परिषदेच्या 23 कोटी 26 लक्ष रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजूरी; सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षण व आरोग्यातून गावांचा सर्वांगीण विकास
नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या स्वः उत्पन्नातून तयार…
