नांदेड- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजे १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. बालदिनाचे औचित्य साधून लोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पेनूर हायस्कूलमध्ये शालेय बालकविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कविसंमेलनात येथील बालकवी पंडित पाटील बेरळीकर, ज्येष्ठ कवी गजानन हिंगमिरे, सुप्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ज्येष्ठ कवयित्री उषाताई ठाकूर, प्रथितयश लेखिका रुपाली वागरे वैद्य आदी साहित्यिक कवी कवयित्री तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. या कविसंमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.
More Related Articles
अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास 20 मे 2025 पर्यत मुदतवाढ नांदेड :- अनुसूचित जाती , नवबौध्द प्रवर्गातील…
“सत्ता मिळाली नाही तरी छातीवर बुलडोजर? — लोकरक्षक की धमकीवाला नेते?”
६ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू असताना, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे…
विरोधकांना मतदानाच्या दिवशी घरात बंद ठेवा! – लल्लन सिंहांचे वक्तव्य बिहारमध्ये वणवा पेटवतो
नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री लल्लन सिंह यांनी बिहारच्या निवडणुकीविषयी अस्वीकार्य विधान केले आहे. “बिहारच्या निवडणुकीत…
