नांदेड- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजे १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. बालदिनाचे औचित्य साधून लोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पेनूर हायस्कूलमध्ये शालेय बालकविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कविसंमेलनात येथील बालकवी पंडित पाटील बेरळीकर, ज्येष्ठ कवी गजानन हिंगमिरे, सुप्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ज्येष्ठ कवयित्री उषाताई ठाकूर, प्रथितयश लेखिका रुपाली वागरे वैद्य आदी साहित्यिक कवी कवयित्री तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. या कविसंमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.
More Related Articles
दारु विक्री करून जमलेले 3 लाख 50 हजार रुपये तिन चोरट्यांनी बळजबरीने चोरले
नांदेड(प्रतिनिधी)-तिन अज्ञात दरोडेखोरांनी उमरी गावात देशी दारु विक्री करून घरी जाणाऱ्या व्यक्तीकडून 3 लाख 50…
तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन बालिकेवर अत्याचार; गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-तामसा पोलीस ठाण्याचे हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन बालीकेसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या 58 वर्षीय व्यक्तीविरुद्ध तामसा पोलीसांनी…
नांदेड जिल्ह्यासाठी 553 कोटी 48 लाख 62 हजार एवढा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी
नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसाच्या नुकसानीसंदर्भाने राज्य शासनाने 553 कोटी 48 लाख 62 हजार रुपयंाचे…
