नांदेड- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजे १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. बालदिनाचे औचित्य साधून लोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पेनूर हायस्कूलमध्ये शालेय बालकविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कविसंमेलनात येथील बालकवी पंडित पाटील बेरळीकर, ज्येष्ठ कवी गजानन हिंगमिरे, सुप्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ज्येष्ठ कवयित्री उषाताई ठाकूर, प्रथितयश लेखिका रुपाली वागरे वैद्य आदी साहित्यिक कवी कवयित्री तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. या कविसंमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.
More Related Articles
पायी जाणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल बळजबरी हिसकावला
नांदेड(प्रतिनिधी)-कला मंदिरच्या बाजूला भाजीपाला घेण्यासाठी पायी जात असलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल दोन चोरट्यांनी बळजबरी हिसकावून…
शेतकऱ्यांची 2 कोटी 27 लाख 28हजार 577 रुपयांची फसवणूक
नांदेड(प्रतिनिधी)-पिकांना जास्तीचा दर मिळवून देतो असे सांगून 2022 ते 2025 दरम्यान अनेक शेतकऱ्यांची 2 कोटी…
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी परमेश्र्वर चव्हाण यांची एक वर्षाची वेतनवाढ स्थगित केली
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी मे-2025 मध्ये पाठविलेल्या कसुरी अहवालाची बारकाईनी तपासणी करून पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर चव्हाण…
