नांदेड- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजे १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. बालदिनाचे औचित्य साधून लोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पेनूर हायस्कूलमध्ये शालेय बालकविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कविसंमेलनात येथील बालकवी पंडित पाटील बेरळीकर, ज्येष्ठ कवी गजानन हिंगमिरे, सुप्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ज्येष्ठ कवयित्री उषाताई ठाकूर, प्रथितयश लेखिका रुपाली वागरे वैद्य आदी साहित्यिक कवी कवयित्री तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. या कविसंमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.
More Related Articles
आर्थीकदृष्टया दुर्बल घटक, इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्कात शंभर टक्के सवलत
नांदेड- आर्थीकदृष्टया दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्ग तसेच इतर मागास वर्ग या प्रवर्गातील…
वाका येथील एका वयोवृध्द इसमाचा खून
नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाका येथील किशन हरी खोसे (65) हा व्यक्ती नेहमीप्रमाणे सकाळी…
इतवारा उपविभाग आणि इतवारा पोलीसांनी पकडला 58 हजारांचा गुटखा
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील पोलीस उपविभाग इतवारा येथील पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आणि इतवारा पोलीसांचे गुन्हे शोध…
