नांदेड- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजे १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. बालदिनाचे औचित्य साधून लोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पेनूर हायस्कूलमध्ये शालेय बालकविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कविसंमेलनात येथील बालकवी पंडित पाटील बेरळीकर, ज्येष्ठ कवी गजानन हिंगमिरे, सुप्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ज्येष्ठ कवयित्री उषाताई ठाकूर, प्रथितयश लेखिका रुपाली वागरे वैद्य आदी साहित्यिक कवी कवयित्री तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. या कविसंमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.
More Related Articles
परस्पराच्या सण- उत्सवात सहभागी होवून सर्वांचा आनंद द्विगुणित करु या – जिल्हाधिकारी
शांतता समिती बैठकीमध्ये जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांचे आवाहन डिजे वापरण्यास मनाई व अनाधिकृत होर्डीग…
स्थानिक कर विभाग बंद करण्याच्या सुचना
नांदेड(प्रतिनिधी)-2017 पासून सुरू झालेल्या वस्तु व सेवाकर (जीएसटी)सुरू झाला आहे. म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास…
नांदेड जिल्हा पत्रकार संघटनेची निवडणुक झालीच तर तथा कथीत नेता आणि शिक्षक पत्रकार संघटनेच्या निवडणुकीत पैशांचा महापुर आणणार काय?
रामप्रसाद खंडेलवाल नांदेड-काही दिवसांपुर्वीच विधानसभा निवडणुका संपल्या आहेत. त्यामध्ये वाहिलेला पैशांचा पुर पुन्हा एकदा नांदेड…
