बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार अधिकार यात्रामध्ये आपल्या भावाला साथ देण्यासाठी प्रियंका गांधी सहभागी झाल्यानंतर राहुल गांधींनी आपले संपूर्ण नियोजन बदलून टाकले आहे. आता राहुल गांधी देखील अमित शहांच्या मैदानावर उतरायला सज्ज झाले आहेत.

२६ ऑगस्ट रोजी प्रियंका गांधी मतदार अधिकार यात्रेत सहभागी झाल्या. त्याच दिवशी उत्तर भारतात ‘हरतालिका’ हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बिहारमधील जवळपास प्रत्येक घरात हा सण साजरा होतो. हा दिवस प्रियंका गांधींनी मुद्दाम निवडला, कारण त्यांनी मतदार अधिकार यात्रेला भावनिक आणि सांस्कृतिक पातळीवर जोडून घेण्याचा प्रयत्न केला.
प्रियंका गांधी या अत्यंत प्रभावशाली वक्त्या आहेत, असे राजकीय विश्लेषक मानतात. विशेषतः महिलांशी संवाद साधण्यात त्यांची शैली खूपच प्रभावी असते. सध्या ही यात्रा मिथिलांचल भागातून जात आहे, जो भाग एनडीएच्या महिला मतदारांसाठी मजबूत घटक मानला जातो. २०१५ च्या निवडणुकीत नितीश कुमार यांनी भाजप सोडून महागठबंधनात प्रवेश केला होता, ज्यामुळे मिथिलेत भाजपची मोठी हानी झाली होती.

मात्र, २०२० च्या निवडणुकीत याच मिथिलांचल भागाने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखले. ‘मिथिला’ हे नाव आणि ‘सीतामढी’ हे त्या भागातील सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र मानले जाते. ८ ऑगस्ट रोजी सीतामढीमध्ये अमित शहांनी आपल्या प्रचाराचा मैदान तयार केला होता. त्यांनी येथे आई सीतेच्या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात केल्याचे जाहीर केले होते. याठिकाणी आधीपासूनच एक मंदिर आहे, जेथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात.
श्री गजाननाच्या आगमनाच्या महोत्सवाच्या दिवशी, प्रियंका गांधी सीतामढी येथील जानकी मंदिरात आपल्या भावासोबत पूजा-अर्चना करणार आहेत. त्यानंतर त्या पुन्हा मतदार अधिकार यात्रामध्ये सहभागी होतील.
मिथिलांचल भागाबद्दल सांगितले जाते की महाकुंभमेळ्याच्या वेळेस येथून लोकांना बस भरून पवित्र स्नानासाठी पाठवण्यात आले होते. मात्र, मतदान चोरीच्या आरोपांनंतर याच भागात रस्त्यावर उतरलेली गर्दी पाहता, त्याचा परिणाम होईल की नाही याबद्दल शंका आहे.
२०२० च्या विधानसभा निवडणुकीत या भागात एकूण ४८ जागांमध्ये निकाल लागला होता, त्यापैकी ३६ जागा ‘एनडीए’ गटाला आणि १२ जागा इंडियाला मिळाल्या होत्या. तेजस्वी यादव यांना सरकार स्थापन करण्यासाठी केवळ १० जागांची गरज होती, पण त्या त्यांना मिळाल्या नाहीत.
मिथिलांचल भागाला सीता मंदिराव्यतिरिक्त विकासाच्या बाबतीत फारसं काही मिळालेलं नाही. रोजगार नाही, उद्योगधंदे नाहीत, गुंतवणूकही नाही. म्हणूनच आज राहुल आणि प्रियंका गांधी सीतामढीमध्ये काय करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
१७ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या यात्रेचा आज दहावा दिवस आहे. ही यात्रा केवळ बिहारपुरती मर्यादित नसून, संपूर्ण देशात परिवर्तन घडवणारी ठरू शकते, अशी चर्चा आहे.निवडणुकीचा अंतिम निर्णय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हातात असला तरी बिहारची जनता त्यांच्याशी कसा व्यवहार करते, यावर या यात्रेचा खरा परिणाम ठरणार आहे.१७ ऑगस्टपासून सुरू झालेल्या यात्रेला मिळणारी प्रचंड गर्दी ही केंद्रातील सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा ठरू शकते.
सीतामढीतील माता जानकीच्या मंदिरात राहुल आणि प्रियंका गांधी यांनी एकत्र भेट दिल्यानंतर स्थानिक जनता काय प्रतिसाद देते, हे राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
