जग युद्धाच्या उंबरठ्यावर – कोण देईल जबाबदारीची जाणीव?

इराणने आज जे केले, त्याची कल्पना होती – पण विश्वास नव्हता.

इराणने कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे. कालपर्यंत ज्या कतारमध्ये फुटबॉलच्या जल्लोषाचा आवाज घुमत होता, तिथे आज स्फोटांच्या गर्जना ऐकू येत आहेत. कतार, जे अमेरिकन कथांमुळे आणि वर्ल्डकपमुळे ओळखले जायचे, तिथे आज युद्धजन्य वातावरण आहे. इराणने या हल्ल्याला “उत्तराचा हल्ला” असे नाव दिले आहे. ही विजयाची घोषणा असल्यास वावगे ठरणार नाही कारण ती घोषणा तेहरानहून नव्हे, तर आकाशातून पडणाऱ्या बॉम्बमधून होत आहे.कधी काळी अमेरिकेची उपस्थिती म्हणजे सामर्थ्याचे प्रतीक मानले जायचे. पण आज तीच अमेरिका कतार आणि इराणमधील बंकरमध्ये लपून बसली आहे. इराणने केवळ क्षेपणास्त्रांचा मारा केलेला नाही, तर अमेरिकेच्या “जगाचा पोलीस” या प्रतिमेलाच हादरा दिला आहे.

इराणने कतारमधील उदयदाह एअरबेस वर हल्ला चढवला आहे. हा बेस अमेरिका वापरत होती. मध्यपूर्वेतील सर्वात मोठा लष्करी हवाई तळ. येथून संपूर्ण क्षेत्रावर फायटर जेट्स आणि गुप्त मोहिमा आखल्या जात होत्या. याच ठिकाणी इराणने सहा क्षेपणास्त्रे पाठवली आहेत. अमेरिकेला या हल्ल्याची शंका होती, पण तरीही जगातील सर्वात प्रगत सुरक्षा यंत्रणा असतानाही ती हे रोखू शकली नाही. कारण या क्षेपणास्त्रांमध्ये केवळ धातू नव्हती – तर बदल्याची आग होती.आज अमेरिका स्वतःच बंकरमध्ये आहे, मग लोकशाहीवरील हल्ल्याची निंदा कोण करणार?कतारने आपला हवाई क्षेत्र बंद केला आहे. सर्व वाहतूक थांबवली आहे. अमेरिकेने कतारमधील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भारतानेही आपला अलर्ट जारी केला असून, भारतीय नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. विचार करा जर हे युद्ध नाही, तर मग ही स्मशान शांतता का?

कतारसारखा छोटा पण श्रीमंत देश, जिथे ७-स्टार हॉटेलमध्ये महालसदृश खोल्या असतात, तिथे आज अमेरिका बंकरमध्ये लपलेली आहे. काहीजण म्हणतात, “हा हल्ला नाही. ही विजयाची उद्घोषणा आहे.” विचार करा, ज्या देशाने गेल्या ७० वर्षांत एकही युद्ध घोषित केले नाही, तो आज विजय साजरा करत आहे.सध्या इराणने फक्त अमेरिकेच्या तळांवर हल्ला केला नाही, तर संपूर्ण जागतिक राजकारणाचे संतुलन ढवळून टाकले आहे. अमेरिकेची स्थिती आता एक घाबरलेले साम्राज्य अशी झाली आहे.आज सकाळी चारच्या सुमारास अमेरिकेने इराणच्या अणुउद्योगांवर बॉम्बहल्ला केला. पाणबुडीतून मिसाईल्स टाकल्या आहेत. हे केवळ सैन्य कारवाई नव्हे तर जगाला उद्ध्वस्त करण्याच्या तयारीची सुरुवात होती. बंकर बस्टर बॉम्ब्स वापरले गेले. यामध्ये डी-२ प्रकारचा बॉम्ब वापरल्याची माहिती मिळते. अद्याप रेडिओऍक्टिव्ह गळती झाल्याचे संकेत नाहीत, परंतु जर गळती झाली, तर तिचा धोका संपूर्ण भारतीय उपखंडावर पडू शकतो.

या युद्धाचा धोका केवळ इराणपुरता मर्यादित नाही

 

अणुउद्योगांवर हल्ला झाल्यास रेडिओऍक्टिव्ह कचरा हवेच्या प्रवाहाद्वारे अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत आणि इतर आशियाई देशांमध्ये पसरू शकतो. हा कचरा जेट स्ट्रीम मध्ये गेल्यास १४० कोटींहून अधिक लोकांना धोका पोहोचू शकतो. काही तज्ज्ञ म्हणतात की हे प्रदूषण शेकडो वर्षे परिणाम करू शकते. याचे परिणाम आजही हिरोशिमा-नागासाकीमध्ये दिसून येतात.

 

ही लढाई सीमांची राहिलेली नाही – ही लढाई मूल्यांची आहे.

ही लढाई सांगते की, आपल्या शास्त्रज्ञांच्या मृत्यूनंतर गप्प बसायचं नाही. प्रत्येक क्षेपणास्त्राला उत्तर मिळेल. प्रत्येक ड्रोनचा हिशोब दिला जाईल. अमेरिका आता ती १९९० च्या दशकातली अमेरिका राहिलेली नाही. आजची अमेरिका घाबरली आहे. बंकरमध्ये बसलेली आहे.आकाशातून मिसाईल्स जमिनीवर आल्या आहेत याचा अर्थ जो वर जातो, त्याला एक दिवस खाली यावंच लागतं. ही लढाई सुपरपॉवर समजल्या जाणाऱ्यांना खरा चेहरा दाखवते आहे. आणि हे शेवट नाही कारण प्रत्येक सुरुवात ही हिमतीनेच होते. पत्रकार रवीश कुमार आणि पत्रकार अशोक वानखेडे यांच्या मतांनुसार.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!