नांदेड- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजे १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. बालदिनाचे औचित्य साधून लोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पेनूर हायस्कूलमध्ये शालेय बालकविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कविसंमेलनात येथील बालकवी पंडित पाटील बेरळीकर, ज्येष्ठ कवी गजानन हिंगमिरे, सुप्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ज्येष्ठ कवयित्री उषाताई ठाकूर, प्रथितयश लेखिका रुपाली वागरे वैद्य आदी साहित्यिक कवी कवयित्री तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. या कविसंमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.
More Related Articles
अर्धापूर पोलीसांनी 71 हजारांचा गुटखा व प्रतिबंधीत तंबाखु पकडला
नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी अक्सा कॉलनी अर्धापूर येथे एका घरावर धाड टाकून 71 हजार 8 रुपयांचा महाराष्ट्र…
Главный сайт казино 1xslots для гейминга в слотах за средства
Азартный клуб пользуется стабильной популярностью и обладает сформированной аудиторией. Геймеры выбирают интерфейс с удобной навигацией,…
हिंद की चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विविध संघटनांसोबत आढावा बैठक
नांदेड :–जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली “हिंद की चादर” कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धी तसेच इतर अनुषंगिक बाबींविषयी…
