नांदेड- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजे १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. बालदिनाचे औचित्य साधून लोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पेनूर हायस्कूलमध्ये शालेय बालकविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कविसंमेलनात येथील बालकवी पंडित पाटील बेरळीकर, ज्येष्ठ कवी गजानन हिंगमिरे, सुप्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ज्येष्ठ कवयित्री उषाताई ठाकूर, प्रथितयश लेखिका रुपाली वागरे वैद्य आदी साहित्यिक कवी कवयित्री तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. या कविसंमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.
More Related Articles
प्राध्यापक भरतीकरता नेट, सेट, पीएच.डी. धारक बेरोजगाराची वारी मुख्यमंत्र्याच्या दारी
*उपमुख्यमंत्री अजित दादांना संघर्ष समितीने दिले नांदेडमध्ये निवेदन* नांदेड -नेट, सेट, पीएच.डी. धारक समितीचे…
वेडसर आई,रडकी लेकरं आणि माणुसकी जपणारे वजिराबाद पोलीस
लोक म्हणतात, “पोलीस खातं जे करेल, तेच होईल.” हे वाक्य कधीकधी नकारात्मक अर्थाने घेतले जाते.…
देशाच्या राजकारणाची पातळी अत्यंत निच्चांकी ; दिल्ली विधानसभा जिंकण्यासाठी जुने हत्यार नवीन म्यानमध्ये
लोकसभा निवडणुकीत 242 या संख्येवर अडकलेल्या भारतीय जनता पार्टीने पुढे अनेक खलबते रचून चार पैकी…
