नांदेड- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजे १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. बालदिनाचे औचित्य साधून लोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पेनूर हायस्कूलमध्ये शालेय बालकविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कविसंमेलनात येथील बालकवी पंडित पाटील बेरळीकर, ज्येष्ठ कवी गजानन हिंगमिरे, सुप्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ज्येष्ठ कवयित्री उषाताई ठाकूर, प्रथितयश लेखिका रुपाली वागरे वैद्य आदी साहित्यिक कवी कवयित्री तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. या कविसंमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.
More Related Articles
ॲथलेटिक्स व टेबल टेनिस खेळासाठी २५ मार्च रोजी खेळाडू निवड चाचणीचे आयोजन
नांदेड – राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी मिशन लक्षवेध हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.…
लिंगायत स्मशानभूमीमध्ये अनोळखी व्यक्तीचे प्रेत सापडले ; खूनाचा गुन्हा दाखल
अनोळखी मयताची ओळख पटविण्यासाठी पोलीसांना जनतेचे आवाहन नांदेड(प्रतिनिधी)-काल दि.29 सप्टेंबर रोजी दुपारी डंकीन परिसरातील लिंगायत…
प्रलंबित वक्फ प्रकरणे तात्काळ निकाली काढा, अन्यथा चेअरमनांच्या घरांवर तीव्र आंदोलन शब्बीर अन्सारी यांचा इशारा
नांदेड(प्रतिनिधी)-तहरीक-ए-औकाफच्या वतीने वक्फ बोर्डाकडे 54 प्रलंबित प्रकरणांचे निवेदन देण्यात आले होते. त्यातील सात प्रकरणे प्राधान्याने…
