नांदेड- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजे १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. बालदिनाचे औचित्य साधून लोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पेनूर हायस्कूलमध्ये शालेय बालकविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कविसंमेलनात येथील बालकवी पंडित पाटील बेरळीकर, ज्येष्ठ कवी गजानन हिंगमिरे, सुप्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ज्येष्ठ कवयित्री उषाताई ठाकूर, प्रथितयश लेखिका रुपाली वागरे वैद्य आदी साहित्यिक कवी कवयित्री तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. या कविसंमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.
More Related Articles
रब्बी हंगामासाठी पाणी पाळ्याचे वेळापत्रक निश्चित;पाण्यासाठी मागणी अर्ज करण्याचे आवाहन
शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पांतर्गत नांदेड – शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये प्रकल्पावरील सिंचनासाठी…
सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे सोने वितळण प्रकरणातील चौकशी अहवाल 31 मार्च रोजी येणार
नांदेड(प्रतिनिधी)-सचखंड गुरुद्वारा येथील सोने वितळणे या प्रकरणाचा अहवाल 31 मार्चपर्यंत सादर करावा असे आदेश मुंबई…
जिल्ह्यातील कोणत्याच मतदान केंद्रावर दिव्यांगांना त्रास होता कामा नये -जिल्हाधिकारी
दिव्यांगांसाठी मतदान केंद्रावर सुविधा पुरविणाऱ्या सनियंत्रण समितीची बैठक नांदेड -अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिव्यांगांना व ज्येष्ठ…
