भारतीय अर्थव्यवस्थेची अशी पोस्टमार्टम रिपोर्ट सादर करता येईल की जणू शेअर बाजार हा रुग्ण आयसीयूमध्ये आहे आणि डॉक्टर अजूनही म्हणत आहेत काळजी करू नका, सर्व काही नियंत्रणात आहे! उभा मार्च अखेर भारतातून विदेशी गुंतवणूकदारांचा नमस्कार करून प्रस्थान केले आहे.भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी इतक्या वेगाने पैसा काढला की जणू लग्नाच्या जेवणात फक्त सेल्फी घेऊन लोक निघून गेले. मार्च महिन्यात तब्बल १.१४ लाख कोटी रुपये बाहेर गेले म्हणजे बाजारातला उत्साह WhatsApp स्टेटससारखा २४ तासांत गायब! रुपया विरुद्ध डॉलर — एकतर्फी सामना परदेशी गुंतवणूकदार पैसे काढताना रुपये विकून डॉलर घेतात. परिणाम काय? डॉलर मजबूत आणि रुपया जिमला न जाता थकलेला. रुपया कमजोर झाला की आयात महाग होते, कंपन्यांचा खर्च वाढतो आणि नफा असा गायब होतो जसा पगार येण्याआधीच EMI खात्यातून निघतो. महागाई आणि बेरोजगारी — जनता कायमची स्पॉन्सर कंपन्यांचा खर्च वाढला की पहिला बळी कोण? कर्मचारी! नोकऱ्यांवर संकट आणि महागाईमुळे सामान्य माणसाची खरेदी क्षमता इतकी कमी झाली आहे की आता “सेल” पाहूनही लोक विचारतात गरज आहे का खरंच? जीवनमान खाली येत असताना भाषणांमध्ये मात्र अर्थव्यवस्था अजूनही “जगातील सर्वात वेगाने धावणारी” दाखवली जाते. कृत्रिम तेजी — SIPचा भावनिक ट्रॅप जनतेला SIP आणि म्युच्युअल फंडच्या माध्यमातून शेअर बाजारात पैसे टाकायला प्रोत्साहन दिले गेले. परिणाम? बाजारात अशी तेजी तयार झाली जी वास्तवापेक्षा आशेवर जास्त चालत होती. कंपन्यांनी या फुगलेल्या व्हॅल्यूएशनवर मोठमोठे कर्ज घेतले जणू पगार वाढेल या विश्वासावर आधीच लक्झरी कार घेतली! आर्थिक भविष्य — मंदीची ट्रेलर रिलीज जर हीच परिस्थिती सुरू राहिली तर मंदीचा फुल सिनेमा लवकरच थिएटरमध्ये लागू शकतो. त्याचा सर्वात मोठा परिणाम होईल तो सामान्य माणसावर नोकऱ्या धोक्यात, बचत कमी आणि आश्वासनांची संख्या मात्र वाढती. निष्कर्ष (व्यंगात्मक सत्य) अर्थव्यवस्था म्हणजे सध्या असा रिअलिटीi शो झाला आहे जिथे: बाजार वर गेला तर “नीती यशस्वी” बाजार खाली आला तर “आंतरराष्ट्रीय परिस्थिती जबाबदार” आणि जनता? कायमची प्रेक्षक… तिकीटही स्वतःचे आणि नुकसानही स्वतःचे! एकंदरीत- अर्थव्यवस्थेचा इंजिन चालू आहे, पण पेट्रोल जनतेच्या खिशातून आणि धूर भविष्याकडे जात आहे. Kanthak Suryatal Post Views: 536 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation इराणच्या तटावर युद्ध राजा आणि सेनापती भांडले तर सैन्याचे काय होते? सोशल मीडियावर टाळं बसणार? लोकशाहीवर येतंय सर्वात मोठं संकट!