न्यायाच्या गाभाऱ्यात राजकारणाची सावली: ‘राम’ आणि ‘न्याय’ यांच्यात अडकलेले चंद्रचूड!

व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड अनेक मुलाखती देत आहेत. या मुलाखतींमध्ये त्यांनी बाबरी मशीद, ज्ञानवापी, कलम ३७० यासारख्या अनेक संवेदनशील निर्णयांबाबत बोलले असून, त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न चर्चेत आला आहे – त्यांच्या दिलेल्या निर्णयांचा आधार कायदा होता की राजकीय इच्छाशक्ती?

१९४९ मध्ये बाबरी मशीदीतील मूर्ती प्रकरणी जो निर्णय आला, तो हिंदू संघटनांच्या विरोधात गेला नव्हता. त्या वेळी असे म्हटले गेले की मशीदच अपमानित करण्याच्या हेतूने उभी करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात स्पष्टपणे म्हटले आहे की मशीद बांधण्यासाठी कोणतीही पूर्वीची इमारत तोडल्याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही. तसेच, प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट अस्तित्वात असतानाही ज्ञानवापी मशिदीचा सर्वे करण्याचा निर्णय कसा दिला गेला, यावरही प्रश्न उपस्थित होतात.

कलम ३७० व जम्मू-काश्मीर संदर्भातील निर्णयांमध्येही धनंजय चंद्रचूड सरकारच्या बाजूने बोललेले दिसतात. निवृत्तीनंतर त्यांनी शासकीय पद स्वीकारल्यावरही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पत्रकार श्रीनिवासन जैन यांना दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी चंद्रचूड यांचे उत्तर ‘आश्चर्यकारक’ असल्याचे म्हटले आहे. या सर्व घटनांमुळे न्यायव्यवस्थेवर काय परिणाम होईल, यावरही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

सत्य हिंदीचे अंकुर आणि पत्रकार मुकेश यांनी या मुलाखतींचे विश्लेषण केले. श्रीनिवासन जैन यांना दिलेल्या मुलाखतीत चंद्रचूड यांना अनेक रोखठोक प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी बाबरी मशीद प्रकरणात निर्णय देताना “मी देवाला विचारले होते” असे विधान केले, ज्यामुळे त्यांच्या धार्मिक कलाचा उल्लेख झाला.

त्यांच्या सार्वजनिक वागण्यातून आणि नरेंद्र मोदींसोबत गणेश पूजेमध्ये सामील होण्यातून त्यांची धार्मिक कल स्पष्ट दिसतो. हे सर्व लक्षात घेता अनेकांना असे वाटते की त्यांनी न्याय दिला कमी आणि सरकारची बाजू घेतली अधिक. १९४९ मध्ये बाबरी मशीदीत मूर्ती ठेवण्यात आली, याकडे कानाडोळा करण्यात आल्याचेही म्हटले जाते.

राम मंदिराच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे की मशीद बांधण्यासाठी कोणतेही मंदिर पाडण्यात आले असल्याचा पुरावा उपलब्ध नाही. पुरातत्त्व विभागाच्या अहवालातही अशा कोणत्याही मंदिराच्या नाशाचा पुरावा सापडलेला नाही. फक्त एवढेच दिसते की तिथे पूर्वी काही धार्मिक वास्तू होती, पण त्या वास्तूचा पाडाव कधी झाला, याचा तपशील पुराव्याअभावी स्पष्ट नाही.परंतु चंद्रचूड आपल्या मुलाखतींमध्ये मंदिर तोडल्याच्या भूमिकेचा उल्लेख करतात. यावरून असा प्रश्न निर्माण होतो की २०१९ च्या निर्णयात जे लिहिलेले नाही, ते न्यायाधीश सेवानिवृत्तीनंतर कसे बोलू शकतात?

१९९१ मध्ये पारित प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्टनुसार स्वातंत्र्यपूर्व काळातील धार्मिक स्थळांची स्थिती बदलली जाणार नाही, असे ठरवले होते. त्यावरून बाबरी मशीद आणि राम मंदिर प्रकरण अपवाद म्हणून का हाताळण्यात आले, हा देखील प्रश्न आहे.

धनंजय चंद्रचूड यांनी दिलेले अनेक निर्णय जसे की निवडणूक बॉन्ड्स, महाराष्ट्र सरकार पाडण्याचा मुद्दा, यामध्येही त्यांच्या भूमिकेवर टीका झाली आहे. त्यांनी निवडणूक बॉन्ड्सना घटनासम्मत म्हटले, परंतु त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. महाराष्ट्रातील घटनाक्रम असंवैधानिक ठरवूनही सरकार चालू ठेवण्यात आले.धनंजय चंद्रचूड यांच्या Why the Constitution Matters या पुस्तकाविषयी अनेक चर्चा सुरू आहेत. सुचित्रा विजयन म्हणतात की चंद्रचूड यांची विचारसरणी आरएसएसच्या जवळ जाणारी आहे. सौरभ दास यांनी लिहिलेल्या “आदर्श आणि यथार्थ : डी.वाय. चंद्रचूड ची न्यायिक कलाबाजी” या लेखात त्यांचा गंभीर आढावा घेतलेला आहे.कारवा मासिकाने ऑक्टोबर २०२४ मध्ये हा लेख मुखपृष्ठ कथा म्हणून प्रकाशित केला होता. त्यात चंद्रचूड यांना “परफॉर्मेटिव्ह जस्टिस” (काम कमी, बोलणे जास्त) म्हणून संबोधले आहे. कारवाच्या म्हणण्यानुसार त्यांनी स्वतःची प्रतिमा तयार केली, पण प्रत्यक्षात काम काहीच केले नाही.

चंद्रचूड यांच्या इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे, मात्र त्यांच्या भाषणांमधून न्यायालयीन निर्णयांची केवळ सारवासारव दिसून येते. “इतिहास विसरता येणार नाही” असे ते वारंवार म्हणतात, पण याचा अर्थ इतिहासाचा बदला वर्तमानात घ्यायचा, असा होतो. हा दृष्टिकोन अत्यंत धोकादायक असल्याचे अनेक तज्ज्ञ म्हणतात.राम मंदिराच्या निर्णयानंतर, निर्णय देणारे पाच न्यायाधीश ताज हॉटेलमध्ये एकत्र दिसले, याचा उल्लेख माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. यावर धनंजय चंद्रचूड यांनी मुलाखतीत नकार दिला, पण फोटो आणि उल्लेख स्पष्ट आहेत.न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की बाबरी मशीद पाडणे हा कायद्याचा भंग होता. मुस्लिम समाजाला त्यांच्या ४५० वर्ष जुन्या धार्मिक स्थळापासून वंचित केले गेले.न्यायमूर्ती रोहिंग्टन नरीमन आणि पिनाकी चंद्र घोष यांनी राम मंदिर निर्णयापूर्वी आपल्या निकालात म्हटले होते की बाबरी मशीद पाडल्यास भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर घातक परिणाम होईल. तरीही मंदिराच्या बाजूने निकाल दिला गेला.

पत्रकार रविश कुमार म्हणतात की राम मंदिराचा निर्णय सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा हिंदी अनुवाद प्रसिद्ध व्हायला हवा. कारण, न्यायालयाने म्हटले आहे की बाबरी मशीद लाखो कारसेवकांतील काही असामाजिक तत्वांनी पाडली. परंतु त्यांना दोषी का ठरवले गेले नाही, याचे उत्तर नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदिर लोकार्पणाच्या वेळी न्यायालयाचे आभार मानले. यामुळे असा संशय उत्पन्न होतो की, पंतप्रधानांना निर्णय आधीच माहीत होता का? हा निर्णय न्यायिक होता की राजकीय?धनंजय चंद्रचूड यांना पुढे काय मिळणार, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, त्यांनी स्वतःच आपल्या शब्दांनी राम मंदिराच्या निर्णयाला आणि न्यायपालिकेच्या विश्वासार्हतेला विवादात आणले आहे, हे मात्र निश्चित.जानेवारी 2024 मध्ये, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी भारतीय संविधानातील अनुच्छेद 370 संदर्भात बोलताना असे म्हटले होते की, “न्यायाधीश आपल्या निर्णयातून बोलतो. एकदा निर्णय जाहीर झाला की तो निर्णय जनतेची संपत्ती ठरतो. त्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणे, चर्चा करणे किंवा विश्लेषण करणे हा जनतेचा अधिकार असतो. त्यामुळे माझ्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देण्याची मला गरज नाही.”आम्हीही हाच आधार मानून हे विश्लेषण जनतेसमोर मांडले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!