नांदेड(प्रतिनिधी)-भारतरत्न नानाजी देशमुख यांचे भाचे, शहरातील वजिराबाद हनुमान पेठ भागातील प्रतिष्ठित नागरिक व जुन्नी येथील प्रगतीशील शेतकरी अविनाशराव किशनराव देशमुख जुन्नीकर यांचे अल्पशा आजाराने दि. ६ ऑेगस्टच्या मध्यरात्री एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी विजया, भूषण उर्फ राजू, उमेश उर्फ हेमू, धनंजय ही ३ मुले, सुना,मुलगी सौ.मंजुषा, जावई डॉ.एकनाथ कुलकर्णी, नाती, नातू, नात जावई, पतवंडे, भाऊ, वहिनी, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता गोवर्धनघाटच्या शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे वाळकीकर,कुंटुरकर,प्रवीण शर्मा यांनी श्रध्दांजली वाहिली. उपस्थितांनीही दोन मिनिटे स्तब्ध राहून अविनाश देशमुख यांना श्रध्दांजली अर्पण केली.
More Related Articles
समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरीक व अपंगाच्या सेवेसाठी लिफ्टची सुविधा
नांदेड:- समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरीक व अपंग यांच्या सेवेसाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात…
इतवारा उपविभागाच्या गुन्हे शोध पथकाने गावठी पिस्तुल, काडतुस, तलवारी आणि खंजीर जप्त केले
नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस उपविभागातील गुन्हे शोध पथकाने दोन जणांना पकडून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल, एक जिवंत…
अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्याला पोलीस कोठडी
नांदेड(प्रतिनिधी)-वसमत तालुक्यात राहणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेला नांदेडमध्ये आणून एका लॉजवर तिच्यावर अनेकवेळेस अतिप्रसंग केलेल्या 24…