अविनाशराव देशमुख यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)-भारतरत्न नानाजी देशमुख यांचे भाचे, शहरातील वजिराबाद हनुमान पेठ भागातील प्रतिष्ठित नागरिक व जुन्नी येथील प्रगतीशील शेतकरी अविनाशराव किशनराव देशमुख जुन्नीकर यांचे अल्पशा आजाराने दि. ६ ऑेगस्टच्या मध्यरात्री एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी विजया, भूषण उर्फ राजू, उमेश उर्फ हेमू, धनंजय ही ३ मुले, सुना,मुलगी सौ.मंजुषा, जावई डॉ.एकनाथ कुलकर्णी, नाती, नातू, नात जावई, पतवंडे, भाऊ, वहिनी, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता गोवर्धनघाटच्या शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे वाळकीकर,कुंटुरकर,प्रवीण शर्मा यांनी श्रध्दांजली वाहिली. उपस्थितांनीही दोन मिनिटे स्तब्ध राहून अविनाश देशमुख यांना श्रध्दांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!