जुन्या भांडणाच्या कारणातून बळीरामपूर येथे 23 वर्षीय युवकाचा खून

नांदेड(प्रतिनिधी)-काल सायंकाळी काही जणांनी जुन्या भांडणाच्या कारणातून एका 23 वर्षीय युवकचा खून केल्याचा प्रकार बळीरामपुर भागात घडला आहे. या बाबत वृत्तलिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पुर्ण झालेली नव्हती. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग तिसऱ्या दिवशी तिसरा खून झाला आहे.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौतमीनगर बळीरामपुर भागात राहणारे व अमोल रामेश्र्वर लांडगे(23) यास काल दि.24 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास काही जणांनी मारहाण करून त्याचा खून केला आहे. या बाबत पोलीस ठाण्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अद्याप प्रक्रिया पुर्ण झालेली नाही असे सांगितले. आमच्या सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे अमोल लांडगेसोबत जुन्या भांडणाच्या कारणावरून हल्ला झाला आणि त्याचा खून करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!