नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरात येत्या २५ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या गणेश विसर्जन सोहळ्यासाठी तातडीने ५० कृत्रिम तलाव उभारण्यात यावेत, अशी मागणी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. वजिराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम हिरावत जैन यांनी १५ सप्टेंबर २०२६ रोजी हे निवेदन प्रशासनाला दिले आहे. २०२४ च्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्याचे आवाहन निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी शहरात ४४,००० पेक्षा जास्त गणेशमूर्तींचे विसर्जन होण्याचा अंदाज आहे. २०२४ मध्ये केवळ २ कृत्रिम तलाव उपलब्ध असल्यामुळे विसर्जनाच्या वेळी जेसीबी (JCB क्र. MH26BG8572) द्वारे मूर्ती पुरण्याची दुर्दैवी घटना घडली होती. यंदा तसा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी पुरेसे तलाव सज्ज ठेवणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मागण्यांचा तपशील आणि प्रस्तावित ठिकाणे: तलावाचे स्वरूप व सोयी: ३०x३०x१० फूट आकाराचे एचडीपीई (HDPE) तलाव, पुरेशी प्रकाश व्यवस्था (लाईट) आणि मोटार पंप असणे आवश्यक आहे. ठिकाणे: गोवर्धन घाट येथे ५, काळेश्वर घाट येथे ५ आणि महापालिकेच्या २० प्रभागांमध्ये (प्रत्येकी २ तलाव) ४० असे एकूण ५० कृत्रिम तलाव तयार करण्यात यावेत. अंदाजित खर्च: या कामासाठी अमृत योजनेअंतर्गत ७५ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. २० सप्टेंबरची मुदत व एनजीटीचा इशारा प्रशासनाने हे तलाव २० सप्टेंबर २०२६ पर्यंत तयार करावेत, अशी मुदत निवेदनात देण्यात आली आहे. या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास राष्ट्रीय हरित लवादाकडे (NGT) याचिका दाखल केली जाईल, असा इशारा गौतम हिरावत जैन यांनी दिला आहे. या निवेदनासोबत फोटो, व्हिडिओ आणि ३० सप्टेंबर २०२४ च्या आरटीआय (RTI) पोचपावतीची प्रत जोडण्यात आली आहे. Kanthak Suryatal Post Views: 182 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation १२ वर्षीय अल्पवयीन बालिकेवरील लैंगिक अत्याचाराने नांदेड हादरले!