या दौऱ्यादरम्यान कल्याण राजू यांनी नागरसोल ते छत्रपती संभाजीनगर या विभागात रियर विंडो निरीक्षण करून सुरू असलेल्या दुहेरीकरण (Doubling) कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. या कामांमुळे मार्गाची क्षमता वाढून गाड्यांची वेळपालनता सुधारण्यास तसेच प्रवासी व मालगाड्यांची वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
दौऱ्याचा एक भाग म्हणून नागरसोल , रोटेगाव , परतूर , सेलू आणि मानवत रोड या अमृत भारत स्टेशन योजना (ABS) अंतर्गत विकसित होत असलेल्या स्थानकांची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान प्रवासी सुविधा, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था तसेच स्थानक विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
कल्याण राजू यांनी दौऱ्यादरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांशी संवाद साधून सुरक्षा, कार्यक्षम संचालन आणि प्रवाशांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या. तसेच या विभागातील सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला. या पाहणीदरम्यान अभियांत्रिकी, संचालन, विद्युत, सुरक्षा तसेच सिग्नल व दूरसंचार विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ही पाहणी नांदेड विभागाच्या पायाभूत सुविधा बळकटीकरण, प्रवासी सुविधा सुधारणा आणि सुरक्षित व कार्यक्षम रेल्वे संचालन सुनिश्चित करण्याच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.

