मुंबई:-ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. Kanthak Suryatal Post Views: 933 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तहसीलदारांनी माहिती अधिकारातील दुसऱ्या अपीलाची सुनावणी 52 दिवस उलटले तरी घेतली नाही बौद्ध लेणी बचावासाठी नांदेडमध्ये 11 रोजी मोर्चा : मोर्चात सहभागी होण्याचे प्रा राजू सोनसळे यांचे आवाहन