बिलोली–जेव्हा नातेसंबंधांचा विचार येतो तेव्हा ते त्यांची मनापासून काळजी घेतात. मग ते आईवडील असोत, भावंडे असोत. हे नाते इतर सर्व नात्यांपेक्षा प्रिय आहे. पण काही लोक हे नाते बिघडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे, बरेच लोक नातेसंबंधांवरचा विश्वास गमावतात.अशाच एका घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. ही घटना १६ एप्रिल रोजी रात्री ११ ते १२ च्या दरम्यान नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरात घडली. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. शिवाय, एखादा छोटा भाऊ त्याच्या मोठ्या भावासोबत असे भयंकर कृत्य करू शकतो का? याची सर्वत्र चर्चा होत आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरात ही धक्कादायक घटना घडली. सुनील प्रल्हाद लाखे आणि नागेश प्रल्हाद लाखे हे दोघे सख्खे भाऊ बिलोली शहरातील आंबेडकर नगर येथे राहत होते. सुनील हा मोठा भाऊ होता आणि नागेश हा छोटा भाऊ होता. शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सुलतानपूरमध्ये त्यांच्या दोघांचेही आईवडिलांच्या मालमत्तेवर एक शेत आहे. याच शेतीवरून दोघांमध्ये पूर्वी वाद होत असे. याशिवाय, पैशाच्या व्यवहारावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत आणि मोठा भाऊ छोट्या भावाच्या पत्नीला अश्लील शिवीगाळ करायचा पण हे भांडण टोकाला पोहोचले. इतका की भाऊ भावाला मारेल.छोट्या भावाने एक भयानक कृत्य करण्याचा निर्णय घेतला. रागाच्या भरात छोटा भाऊ नागेशने त्याचा मोठा भाऊ सुनीलवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सुनीलचा जागीच मृत्यू झाला. भावाची हत्या केल्यानंतर नागेश तेथून पळून गेला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच बिलोली पोलीस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय आरोपी नागेशला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. मोठा भाऊ सुनील एकटाच होता, त्याला आईवडील नव्हते, पत्नी नव्हती, मुले नव्हती, तरीही छोट्या भावाने शेवटी मालमत्तेवरून मोठ्या भावाची हत्या केली. मोठ्या भावाची हत्या करणारा छोट्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लोखंडे करत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 2,483 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation रंजनाबाई मल्हारराव कांबळे यांचे निधन भारताचे 52 वे सरन्यायाधीश डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारपुत्र भुषण गवई