स्वातंत्र्य दिनापासून अर्धापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

नांदेड,(प्रतिनिधी)-लिंबगाव येथे होणाऱ्या बेकायदेशीर मुरूम उत्खन्ना विरुध्द भारताच्या स्वातंत्र्य दिनापासून अर्धापूर येथील तहसील कार्यालयासमोर काही कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाला सुरूवा केली आहे.
लिंबगाव येथील बेकायदेशीर व अवैध मुरुम उत्खन्ना संदर्भाने पत्रकार शेख शकील, शेख वासिम, शेख बशीर शेख अनिल, साहेबराव सरोदे, सय्यद इमरान अली व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आमरण उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते सय्यद मंजुर अली, शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष भगवानराव कदम, समाजवादी पार्टीचे अलिम दादा व शहराध्यक्ष शेख नजीर या या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!