अमेरिकेने भारताच्या अनेक निर्यात वस्तूंवर ५०% दराने टेरिफ (शुल्क) लावले आहे. त्यामुळे भारतीय उद्योगजगतात चिंता व्यक्त केली जात आहे. कोणत्या उद्योगांना फटका बसेल, कोणाचा फायदा होईल, यावर चर्चा सुरू आहे.पण KnockingNews.com च्या गिरीजेश वशिष्ठ यांच्या मते, ही वेळ भारतासाठी आनंदाची आहे. कारण अमेरिका भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, अनेकदा घडते तसे, या दडपणाच्या धोरणातून भारताला उलट फायदा होऊ शकतो आणि तोही दीर्घकाळ टिकणारा. गिरीजेश वशिष्ठ म्हणतात की, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर “उपकारच” केले आहेत. आता केंद्र सरकार, विशेषतः नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर टीका होईल. विरोधी पक्षांना हे सांगण्याची संधी मिळेल की, “तुम्ही एका मोठ्या देशाशी संबंध चांगले ठेवू शकला नाहीत.”टेरिफची टक्केवारी पाहता, भारतावर ५०%, बांगलादेश व व्हिएतनामवर २०%, चीनवर देखील २०% शुल्क लावण्यात आले आहे. यातून स्पष्ट होते की सर्वाधिक दडपण भारतावर आणले जात आहे. खरे पाहता, भारत अजूनही परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरणाच्या बाबतीत मागे आहे, पण हे ५०% टेरिफ भारतासाठी नव्या प्रकारचे “स्वातंत्र्य” घेऊन येऊ शकते. कारण भारत अमेरिका तुलनेत खूपच कमी निर्यात करतो आणि अधिक आयात करतो. त्यामुळे हा निर्णय अमेरिका स्वतःच्या अडचणी वाढवणारा ठरेल.रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेने भारतावर राग ठेवला आणि टेरिफ वाढवले. विक्की हेल म्हणतात की, डोनाल्ड ट्रम्प यांना आता सावधपणे निर्णय घ्यावा लागेल. भारताशी व्यवहार तुटल्यास अमेरिकेलाच मोठे नुकसान होऊ शकते. जगभरातून आता या टेरिफवर विश्लेषण येत आहे. त्यानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% टेरिफ लावून स्वतःच्या पायावर कुर्हाड चालवली आहे.हे अगदी तसेच आहे जसे आम्ही पाकिस्तानसोबत काही निर्बंध लावले होते, तसेच ट्रम्प यांनी भारतावर केले. भारताला दाबण्यासाठी आता फारसे काही उरलेले नाही.Reuters संस्थेच्या विश्लेषणानुसार, भारताला या टेरिफ वाढीमुळे फायदा होणार आहे. त्यांच्या अंदाजानुसार भारताची सुमारे ३.५ अब्ज डॉलर इतकी बचत होईल. ही बचत केवळ उद्योगपतींना नाही, तर भारताच्या व्यापार धोरणासाठी महत्त्वाची आहे. भारताची वार्षिक निर्यात ८७ अब्ज डॉलर्सची आहे. रशियाकडून स्वस्त दरात खरेदी केलेल्या इंधनामुळे भारताला या खर्चात मोठा फायदा होतो. टेरिफमुळे होणारे नुकसान वजा केले तरी नफा अधिक राहील.या पार्श्वभूमीवर भारत आता अमेरिकेशिवाय जगणे शिकेल. BRICS, रशिया, चीन यांच्याशी मैत्री वाढवण्यासाठी भारताला आता संधी उपलब्ध आहे. याआधी आपण अमेरिका समोर नतमस्तक झालो होतो, त्यामुळे स्वायत्त निर्णय घेणे कठीण झाले होते. बायडन यांच्या कार्यकाळात अमेरिका भारताकडून मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करत होती, त्यामुळे भारत अमेरिकेचा ग्राहक होता. आता ही स्थिती उलटली आहे. अमेरिका जर ग्राहक नाही, तर भारत अधिक स्वतंत्र निर्णय घेऊ शकेल.हीच ती स्थिती आहे जी इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या काळात होती. भारत आता अमेरिकेवर अवलंबून राहणार नाही. अमेरिकेच्या महागड्या शस्त्रास्त्र खरेदीतूनही भारत स्वतःला मोकळा करू शकतो.यामुळे रशियाचा फायदा होणार आहे. औषधनिर्मिती क्षेत्रात अमेरिका मोठा ग्राहक असला, तरी भारतात निर्माण होणारी जेनेरिक औषधे अमेरिकेसाठी अजूनही अत्यंत उपयुक्त आहेत.भारताशिवाय दुसरा कोणताही देश, विशेषतः स्वीडनसारखे देश, जेनेरिक औषधे तयार करण्यात भारताशी स्पर्धा करू शकत नाहीत. कारण तिथे नियम कठोर आहेत, आणि उत्पादन खर्च जास्त आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकेतील लोकांना आता भारतातील जेनेरिक औषधे ५०% जास्त दराने खरेदी करावी लागतील. यातून मिळणारा अतिरिक्त पैसा अमेरिकेच्या तिजोरीत जाईल, मात्र विक्री भारतीय उत्पादकांचीच राहील.भारतीय व्यापारी आता नवीन ग्राहक देश शोधतील, त्यामुळे भारताची बाजारपेठ आणखी विस्तारेल.दुसरा महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे रत्न व आभूषण. विशेषतः हिऱ्यांना कलात्मकतेने आकार देण्याचे कौशल्य भारतीय कारीगरांकडे आहे. हे काम अमेरिकेत करणे अत्यंत खर्चिक ठरेल.तिसरे क्षेत्र म्हणजे आयटी सेवा. भारतातील इंग्रजी भाषेचे वातावरण, कुशल मनुष्यबळ यामुळे चीनदेखील आपल्याशी स्पर्धा करू शकला नाही.जर अमेरिकेने भारतीय आयटी तज्ज्ञांना काढून टाकले, तरी ते दलाल कंपन्यांच्या माध्यमातून पुन्हा अमेरिकेचेच काम करतील. त्यामुळे भारतातील आयटी क्षेत्राला फारसा फटका बसणार नाही. युरोपियन युनियन, फ्री ट्रेड अलायन्स, लॅटिन अमेरिका या भागात भारतासाठी नव्या बाजारपेठा उघडू शकतात. कृषी, वस्त्रोद्योग व यंत्रसामुग्री क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध होऊ शकते.रशियाशी भारताचे जुने संबंध लक्षात घेता, भारत रशियाकडूनही व्यापार वाढवू शकतो.जर भारत स्वतंत्र झाला आणि कररचना सुधारली, तर शेतकऱ्यांना अनुदान देणे सोपे जाईल.आज भारत पेट्रोलवर २०% पर्यंत इथेनाल भेसळ करून काम चालवत आहे, तोही थांबेल आणि स्वयंपूर्ण धोरण निश्चित होईल.जर पुढेही अमेरिकेने हेच धोरण चालू ठेवले, तर जगाला हे स्पष्ट होईल की अमेरिका विश्वासघातकी देश आहे.अशा देशाशी मैत्री म्हणजे आत्मघात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जर अजून काही भारतासोबत वाईट केले तर ,त्याचा फायदा भारतालाच होणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 525 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तथ्यांऐवजी थरार? – तिरुपती एक्स्प्रेसमधील चोरीचे दरोड्यात रूपांतर;पत्रकारांनी घडवलेला प्रकार हत्तीरोग रुग्ण यांना दिव्यांग प्रमाणपत्र करिता ग्रामीण रुग्णालय भोकर येथे तपासणी शिबीर संपन्न