संपत्तीची लूट: भाजपच्या मंत्र्याच्या नावावर 1000 कोटींचा घोटाळा! कधी काळी भारतात ‘चहापाणी’ या निरुपद्रवी वाटणाऱ्या शब्दातून भ्रष्टाचाराची सुरुवात झाली. पुढे काळ बदलला, आणि शब्दही बदलले. कुणी त्याला ‘फिश’ म्हणू लागले, कुणी ‘कमिशन’, तर कुणी ‘महागाई’चं गोंडस नाव दिलं. भ्रष्टाचाराची ही व्याख्या रोज नवीन रूपं घेत गेली. आजच्या काळात, मोदी सरकारच्या ‘अच्छे दिन’ घोषणेमुळे खरोखर चांगले दिवस आले आहेत पण ते भ्रष्टाचार करणाऱ्यांसाठी! वाचकहो, विचार करा हजार, दहा हजार, पन्नास हजार, दोन कोटी, दोनशे कोटी, हजार कोटी, हे आकडे आता सामान्य झालेत. आम्ही आज ज्याप्रकरणाची माहिती देत आहोत, त्यात थेट एका मंत्र्याने एक हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतात दरवर्षी एक हजार कोटींची उलाढाल करणाऱ्या कंपन्या फक्त दीड हजार आहेत. अशा मोठ्या कंपनीचं निर्माण व्हायला अनेक पिढ्या जातात. पण भाजपमधील एका महिला मंत्र्याने अवघ्या काही वर्षांत हजार कोटींचं ‘काम’ करून दाखवलं आहे.मोदींना आता धन्यवाद म्हणावं लागेल या गतीमान भ्रष्टाचाराला चालना दिल्याबद्दल. कारण दुसरं काय म्हणणार? लोक म्हणतात, हे गोड लोक आहेत स्वतःच भ्रष्टाचार करतात, स्वतःच आरोप लावतात, चौकशीचे आदेश स्वतःच देतात, आणि शेवटी प्रकरण थंड बस्त्यात जातं. भाजपमध्ये ‘सर्वस्वी मुभा’ आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच 1000 कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्याच्या चौकशीचे आदेश दिले, पण त्यांना पदावरून हटवले नाही. इतकी सहानुभूती तर एखादी प्रेमिकाही दाखवत नाही!मोदींच्या चेहऱ्यावरचं निर्दोषपण भारतासाठीच नव्हे तर गोदी मीडियासाठीही सौंदर्याचं प्रतीक आहे. म्हणूनच त्यांना ‘विश्वगुरू’ ही पदवी बहाल करण्यात आली! ‘दैनिक भास्कर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मध्यप्रदेश सरकारने आपल्या आदिवासी मंत्र्याविरोधात (ज्यांच्यावर 1000 कोटी रुपयांची लाच घेण्याचा आरोप आहे) चौकशी सुरू केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने मध्यप्रदेश सरकारला 21 एप्रिल 2025 रोजी पत्र लिहून आदेश दिला की, सात दिवसांत चौकशी पूर्ण करून अहवाल पाठवावा.सात दिवसांत 1000 कोटींचा घोटाळा शोधायचा? ही गंभीर चौकशी की विनोदी नाटिका? माजी आमदार किशोर समरीते यांनी याबाबत पंतप्रधानांना थेट पत्र पाठवले. त्यांनी असा आरोप केला की जलजीवन मिशनसाठी केंद्र सरकारने दिलेल्या 30000 कोटींपैकी 1000 कोटी रुपये मंत्री आणि अधिकाऱ्यांनी स्वतःच्या घशात घातले. मुख्य अभियंता बी.के. सोलगरिया, लेखापाल महेंद्र खरे, पीआयओ जलनिगमचे डायरेक्टर जनरल, हे सर्व या भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप आहे.बैतूलच्या अभियंत्याने तर काम न करता 150 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीतून काढले, असे म्हटले जाते. समरीते म्हणतात की हे प्रकरण देशातील सर्वांत मोठ्या घोटाळ्यांपैकी एक ठरेल. त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांनुसार, 7000 कामांची बनावट प्रमाणपत्रं केंद्र सरकारकडे पाठवण्यात आली आहेत.आता गंमत बघा,पंतप्रधान कार्यालयाने चौकशीचे आदेश दिले आणि मध्यप्रदेश सरकारने आपल्या मंत्र्यावर चौकशी सुरू केली! म्हणजे एखादा लिपिक म्हणतोय की “मी जिल्हाधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करतो आहे.” ही भाजपच्या ‘नैतिकते’ची झलक आहे.कोणताही अभियंता मंत्र्याच्या समोर खुर्चीत बसत नाही आणि आता तोच अभियंता त्यांच्यावर चौकशी करतोय! हा विनोद नाही तर काय? मध्यप्रदेशात पसरलेल्या भ्रष्टाचाराच्या या जाळ्याचा तपास सात दिवसांत पूर्ण होणार आहे, असं जाहीर केलं जातंय. हे ऐकून पत्रकार नवीन कुमार यांनी म्हटलं की, “मोदी आणि शिवराज सिंह यांच्या आराध्य अशिक्षित शास्त्रींना सुद्धा हे शक्य होणार नाही!”मुख्य अभियंता संजय अंदमान यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितलं, “आम्ही प्रकरण समजून घेत आहोत.” म्हणजे चौकशीचा अहवाल सात दिवसांत द्यायचा आहे आणि चौकशी अधिकारी म्हणतोय की अजून प्रकरण समजून घेतोय!आणखी एक विशेष बाब मंत्री ‘संपत्तीया’ यांचं नावही उपयुक्त आहे. जणू त्यांच्या जन्मावेळीच ठरवलं गेलं की या व्यक्तीचं नातं संपत्तीशीच राहील. त्या एम.ए. हिंदी आहेत, भाजप महिला मोर्चामध्ये काम करून वर आलेल्या आहेत. एकदा राज्यसभेत, आता मंत्री. आरोग्य आणि जल विभागाशी जुने संबंध आहेत.संपत्तीयाचं जीवन म्हणजे अजब आणि गजब गोष्ट. दिवसभरात ७२ वेळा नमस्कार करणारा अभियंता आज त्यांच्या विरोधात चौकशी करतोय, ही भारतीय राजकारणाची शोकांतिका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीकाळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली होती की, “रेनकोट घालून आंघोळ करतात.” आज त्यांना स्वतःला विचारायला हवं ‘रेनकोट घालून भ्रष्टाचाराची आंघोळ’ तुमच्या सरकारमध्ये इतकी सामान्य कशी झाली?उत्तर द्या, मोदीजी असे आर्टिकल 19 चे नवीन कुमार विचारात. Kanthak Suryatal Post Views: 951 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation माँ गोदावरी स्वच्छता अभियानाचा शंभरावा आठवडा उत्साहात साजरा; महास्वच्छता उपक्रमात सामाजिक एकतेचे दर्शन 12 बियाणे, खत, कीटकनाशक विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द