शोध पत्रकारितेने उघड केले किरण बेदीचे रहस्य

 

भारतामध्ये इंदिरा गांधी यांच्यानंतर गावापर्यंत नाव पोहोचलेली व्यक्ती म्हणजे किरण बेदी. त्या भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी होत्या. कठोर प्रशासनासाठी प्रसिद्ध असलेल्या किरण बेदी यांनी कायद्याचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची हिम्मत दाखवली. त्यांच्याविषयी अनेकांनी आदर बाळगला, आणि अनेक मुलींनी त्यांना आपला आदर्श मानले.

‘द न्यूज मिनिट’ आणि ‘न्यूज लॉटरी’ या दोन पत्रकारिता संस्थांनी २२ वर्षांपूर्वीच्या एका घटनेचा अहवाल नुकताच समोर आणला आहे. या अहवालानुसार, किरण बेदी यांनी २००३ मध्ये आपल्या मुलीची गुप्त चौकशी केली होती. या कामासाठी दिल्ली पोलिसांचा गैरवापर करण्यात आला होता. त्या काळात किरण बेदी यांच्या मुलीचे व्यावसायिक गोपाळ सुरी यांच्याशी घनिष्ठ संबंध होते, आणि त्याविषयी माहिती मिळवण्यासाठी गुप्त चौकशी करण्यात आली.

या प्रकरणात असा खुलासा झाला की, या किरण बेदी यांच्या प्रतिष्ठेचा गैरफायदा घेत एका व्हिसा घोटाळ्याचा कट रचला जात होता, ज्याद्वारे भारतीय नागरिकांना परदेशात पाठवले जात होते. काहींनी याला ‘मानव तस्करी’ असेही म्हटले. मात्र, किरण बेदी यांच्या प्रतिष्ठेमुळे हे प्रकरण दडपण्यात आले.

२०१३ नंतर आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या परीक्षेत ‘इंटेग्रिटी आणि एथिक्स’ हा पेपर समाविष्ट करण्यात आला. किरण बेदी यांनी ज्या वेळी आयपीएस प्रशिक्षण घेतले, त्या वेळी हा पेपर नव्हता. मात्र, पोलीस अकादमीमध्ये इमानदारीचे प्रशिक्षण दिले जात होते आणि आजही दिले जाते. त्यामुळे, किरण बेदी यांच्या वर्तनाचा प्रश्न येथे उपस्थित होतो.

तत्कालीन परिस्थितीत दिल्ली पोलीस यंत्रणेचा वापर करून त्यांच्या मुलीच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. पण या संदर्भात कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नाही. त्यामुळे, कायदा सर्वांसाठी समान आहे का, की प्रतिष्ठेच्या जोरावर काही प्रकरणे दडपली जातात, हा प्रश्न उपस्थित होतो.

इंदिरा गांधी यांच्यानंतर गावागावांत प्रसिद्ध असलेल्या किरण बेदी यांचे कार्य निश्चितच उल्लेखनीय आहे. पण प्रत्येक प्रतिष्ठित व्यक्तीचा एक सार्वजनिक चेहरा असतो आणि दुसरा लपलेला चेहरा असतो. नयना सहानी प्रकरण, मानव तस्करी प्रकरण यांसारख्या गुन्ह्यांमध्ये काहींना शिक्षा झाली, पण किरण बेदी यांच्या मुलीच्या प्रकरणात काहीच कारवाई झाली नाही.

 

त्यामुळे, कोणीही कोणालाही आदर्श मानण्यापूर्वी विचार केला पाहिजे. किरण बेदी यांचे कार्य नक्कीच प्रभावी होते, पण त्यांचे नैतिक वर्तन आणि प्रशासनातील भूमिकेचे मूल्यांकन करताना या सर्व गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!