नागपूर जळत आहे की जाळले जात आहे? – महाराष्ट्र आणि देशाच्या भविष्यातील गुप्त कटकारस्थान

नागपूर जळत आहे का जाळले जात आहेत, याचा शोध घेण्याची एक नवीन आवश्यकता आता महाराष्ट्राच्या न्हवे तर देशासमोर उभी राहिली आहे. आम्ही नागपूरला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची भूमी असे ओळखतो, जिथे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. नागपूर हे ठिकाण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयामुळे प्रसिद्ध आहे. मागील दहा वर्षांमध्ये नव्हे, तर अनंतकाळापासून नागपूरमध्ये काही वाईट घडलं नव्हतं, पण परवाच्या रात्री झालेल्या जाळपोळ आणि त्रासामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा कारण काय आहे? त्याची आवश्यकता होती का? याचा शोध घेणं आवश्यक आहे.

 

भारतीय जनता पार्टी भविष्याच्या भारतीय जनता पार्टीसाठी एक नवीन रचना करत आहे का, असा प्रश्नही आता उपस्थित होतो. छत्रपती संभाजी राजांबद्दल समजून घेण्यासाठी आम्हाला “छावा” चित्रपटाची आवश्यकता आहे का? आपल्या पूर्वजांबद्दल आपल्याला माहिती नाही, हे त्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकेल? मालोजीराजे भोसले यांनी अहमदनगरच्या शाह शरीफ दर्ग्यावर नवस केल्यानंतरच शहाजीराजे भोसले आणि त्यांचे भाऊ अमीरराजे भोसले यांचा जन्म झाला होता. आपल्याला आपल्याच पूर्वजांचा इतिहास माहित नाही आणि हिंदू-मुस्लिम वादावर आधारित हेच नवीन विवाद महाराष्ट्रात काय साधणार आहेत, असा प्रश्न आहे.

भयंकर बहुमत घेऊन भारतीय जनता पार्टी सरकार महाराष्ट्रात राज्य करत आहे. आता त्याच्यापेक्षा जास्त काही हवं आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आजचे आणि लोकसभा निवडणुकीपूर्वीचे भाषण एकदा ऐकायला हवे. दोन्ही भाषणांची तुलना केल्यास, हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो. औरंगजेबाबद्दल ज्या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले, तसेच योगी आदित्यनाथ देखील बोलतात. आजच्या परिस्थितीत, योगीचे मुख्यमंत्री पद कायम ठेवणे हे भारतीय जनता पार्टीच्या पेक्षा अधिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातात आहे.

जेव्हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी निवडणूक हरले होते, तेव्हा संघप्रमुख सुदर्शनजी म्हणाले होते की, “आपल्याला नवीन पिढी समोर आणायची आहे,” आणि त्या नवीन पिढीसाठी आशीर्वाद द्यायला हवा. याच नवीन पिढीसाठी आता भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आणि नवीन पंतप्रधान संघाच्या मर्जीचा हवा होता. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्च रोजी नागपूरला येणार आहेत. ते संघाच्या मुख्यालयात जाणार आहेत आणि त्याठिकाणी ही मत मंथन होईल, अशी चर्चा आहे. ती संघापुढे शरणागती असू शकते, किंवा आपल्या मागणीला जोर देण्यासाठी असलेली ही भेट आहे, याचे उत्तर काळाच्या ओघात ठरेल.

 

काही जण सांगतात की, गुजरातचे मुख्यमंत्री पद नरेंद्र मोदींना प्रवीण तोगडियांनी दिले होते. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी प्रवीण तोगडियांसोबत काय केलं, याचा अभिलेख उपलब्ध आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ताकदवान असेल तर नागपूर का जळत आहे, असा विचार आणि विषय उपस्थित होतो. संजय राऊत म्हणतात की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे दिग्गज लोक नागपूरचे आहेत, सोबतच तीन-चार मंत्री आसपासच्या भागातून आहेत. मग, कोण नागपूरमध्ये दंगल करेल?

 

भारतीय जनता पार्टीतील आजची हालचाल भविष्यातील बीजेपी पाहत आहे का? त्यासाठी त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत हवी आहे का? या जगात कोणीही अमृतपान करून आलेले नाही. पण भविष्याचे नियोजन करण्यात अनेक लोक गर्क आहेत. हा राजकारणाचा खेळ नाही, तर सर्वसामान्य माणसाच्या जीवनात सुद्धा असा खेळ सुरू असतो. पुढील पंतप्रधान म्हणून आदित्यनाथ आणि अमित शहा यांच्या चेहऱ्यावर प्रधानमंत्री पद पाहिलं जात आहे. पण संघ याच्या विरोधात आहे का? याची चाचणी करण्यासाठी नरेंद्र मोदी नागपूरला येणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे.

 

देवेंद्र फडणवीस आज एवढ्या द्वेषाने हिंदू-मुस्लिम या विषयावर बोलत आहेत, म्हणजे तो भाग खासदार राहुल गांधी यांच्या जातीय जनगणनेला हाणून पाडण्यासाठी आहे का? याचाही विचार होण्याची गरज आहे. नरेंद्र मोदी संसदेत भाषण करताना म्हणाले होते की, “कुंभमेळा ही संस्कृती आहे,” त्याचवेळी राहुल गांधी संसदे बाहेर सांगत होते की, “कुंभमेळ्यात मरणाऱ्यांना श्रद्धांजली देणे ही एक जबाबदारी आहे.” आज नागपूरच्या भागात सर्वाधिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहतात. त्या भागात जाळपोळ, गोळीबार, अश्रुधूर अशा घटनांचे घडणे सुरू झाले आहे. उत्तर प्रदेशमधील संबल जिल्ह्यात घडलेली स्थिती आता नागपूरला आणण्यात आली आहे का?

 

परंतु नागपूरमध्ये, देवेंद्र फडणवीस यांनी या स्थितीची हाताळणी करण्याऐवजी, “कोणी रस्त्यावर उतरले, तर त्याचा हिशोब करू,” असे सांगून काय साध्य केले? रस्त्यावर कोण उतरले, सुरुवात कोणी केली, त्याचा परिणाम काय झाला, त्यावर प्रतिक्रिया काय आल्या, यावर विचार करणे आवश्यक आहे. म्हणूनच, “नागपूर मॉडेल” तयार करण्यात आले आहे का?

 

आपल्या राजांचा इतिहास आपल्याला माहीत नाही. त्यांना समजून घेण्यासाठी आम्हाला “छावा” चित्रपट पाहावा लागतो का? ही किती दुर्दैवी बाब आहे! दहा-बारा दिवसांपूर्वी, पत्रकार देवेंद्र फडणवीस यांचे मित्र प्रशांत कोरटकर यांनी इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्या बद्दल वापरलेले घाणेरडे शब्द इतके घाण होते की त्याबद्दल कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झाला. नंतर हा प्रशांत कोरटकर गायब झाला. “प्रशांत कोरटकर चिल्लर व्यक्ती आहे,” असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जर तो चिल्लर व्यक्ती आहे, तर मोठ-मोठे पोलीस अधिकारी त्याच्यासोबत फोटो काढण्यात का रस दाखवतात? हा प्रश्न देखील उपस्थित होतो.

 

प्रशांत कोरटकर म्हणाले होते की, “आजही ब्राह्मणांचे राज्य आहे.” कारण इंद्रजीत सावंत म्हणाले होते की, “छत्रपती संभाजी राजांना मुघलांनी अटक केली तेव्हा, त्यात काही ब्राह्मणांचाही सहभाग होता.” यावर प्रशांत कोरटकरचे उत्तर इतके वाईट होते की ते लिहिण्याची ताकद आमच्यात लेखणीत नाही. पण दाखल झालेल्या गुन्हा आणि नंतर फरार झाल्याची बाब महत्त्वाची आहे.

 

नागपूरमध्ये एक प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर ते लोक एका दर्ग्यावर गेले आणि तेथील दर्ग्याची चादर ओढून ती जाळून टाकली. त्यावर कुरान शरीफच्या पवित्र पुस्तकांतील काही शब्द होते. दर्ग्याच्या लोकांनी गणेश पेठ पोलीस ठाण्यात याची तक्रार दिली, परंतु पोलिसांनी काहीच दखल घेतली नाही. त्यामुळेच प्रतिक्रिया जोरदार उमटल्या.

 

खरे तर, जेव्हा आपण मालोजीराजे भोसले यांचा विचार करतो, तेव्हा ते पुणे येथील सरदार होते, अहमदनगर राज्याच्या निजामशाहीतील ते सरदार होते. अहमदनगरमधील शाहशरीफ दर्ग्यात मालोजीराजे आणि त्यांच्या पत्नी ह्या दोघांनी नवस केल्यानंतर शहाजीराजे आणि अमीरराजे भोसले यांचा जन्म झाला होता. शहाजीराजांच्या नावात दर्ग्यातील नावाचाच “शाह” ह्या शब्दाचा उपयोग करून त्यांचे नाव शहाजी ठेवले गेले. या नंतर, शहाजी राजे यांनी मुस्लिम राजांची सेवा करत राज्य चालवत होते. बेंगळोर आणि तंजावरसुद्धा मराठ्यांची जागीर होती. ते युद्ध मुस्लिम विरुद्ध हिंदू नव्हते, तर ती सत्तेसाठीच लढाई होती.

 

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, नगर राज्यातील निजामाच्या मृत्यूनंतर शहाजीराजांनी १० वर्षाच्या निझाम मुर्तुझा यांनी आपल्या मांडीवर बसवून त्यांना राजा बनवले होते. अर्थात त्यांचा राज्याभिषेक करून घेतला होता. याचा स्पष्ट संदेश आहे की शहाजीराजांवर निजामशाहीचा किती विश्वास होता. हा इतिहास काही लपून राहणार नाही, आणि आपण कान डोळा केला तरी तो बदलला जाणार नाही. म्हणून, आम्ही आपले संविधान मान्य करू कारण आमच्यासाठी तोच सर्वात मोठा ग्रंथ आहे. मुस्लिम आणि हिंदू यांचे भांडण उभे करू नका जे भारतासाठी भविष्यात धोकादायक ठरेल.

सोर्स – आशिष चित्रांशी आणि पुण्य प्रसून वाजपेयी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!