आता बीसीसीआय म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) हे फक्त क्रिकेटचे नियंत्रण करणारे संस्थान राहिले नसून, ते “भाजपा क्रिकेट बोर्ड” झाले आहे की काय, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.एशिया कप जिंकल्यानंतर ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाले की, “ज्या देशाचे नेते समोर येऊन स्वतः बॅटिंग करतात, त्या देशातील खेळाडू खुल्या मनाने बॅटिंग करणारच.” या विधानाचा अर्थ असा घेतला जातो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच भारताने आशिया कप जिंकला.दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय संघाच्या विजयाला “ऑपरेशन सिंदूर” सोबत जोडत एक नवीन क्रांती घडवली आहे, असं सांगितलं. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की, मोदी हे अमेरिकेला हे दाखवू इच्छित आहेत का की—”पूर्वीही तुम्ही काही केलं नाही आणि आताही काही केलं नाही.””ऑपरेशन सिंदूर” आणि क्रिकेट यांना एकत्र करून खेळालाही राजकीय रंग दिला जात आहे का, हा विचारप्रवृत्त करणारा मुद्दा आहे. या पार्श्वभूमीवर, आम्हाला काय घ्यावं हे समजत नसल्यामुळे आम्ही आमचे दोन मुद्दे वाचकांसमोर मांडत आहोत: ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने विजय मिळवला क्रिकेटमध्येही भारताने विजय मिळवला या दोन घटनांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर (X) वर पोस्ट केली की, “उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे विजय.” यावरून प्रश्न उपस्थित होतो की, या विधानात खरा आशय नेमका कोणता आहे?सूर्यकुमार यादव यांचे विधान—”बरे वाटते, जेव्हा देशाचे नेते समोर येऊन स्वतः स्ट्राइक घेतात. तेव्हा वाटते की त्यांनी स्वतः रन्स केले आहेत. अशा वेळी खेळाडू मनमोकळेपणाने खेळतात”—हे भाजपप्रणीत राष्ट्रवादाला पूरक असल्यासारखे भासत आहे. त्यामुळे प्रश्न उभा राहतो की, सूर्यकुमार यादव काय दाखवू इच्छित आहेत? त्याचवेळी, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणतात की, “उत्तर सारखंच आहे – विजय.” पण खरे काय, हे अजूनही अनुत्तरित आहे.त्यावरून असा समज निर्माण होतो की, पंतप्रधानांची पोस्ट ही अमेरिकेला उत्तर देण्यासाठी होती का? आणि खेळाला राजकारणाशी जोडण्याचा हा प्रकार प्रथमच घडतो आहे का? आपण इतिहासात पाहिलं, तर: 1983 मध्ये भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यांनी त्याचा राजकीय लाभ घेतला नव्हता. नंतर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातही भारतीय संघाने मोठमोठे विजय मिळवले, पण त्याचे श्रेय मनमोहन सिंग यांना देण्यात आले नाही. मग आताच का खेळाडूंचे श्रेय राजकीय नेतृत्वाला दिले जात आहे?या पार्श्वभूमीवर सूर्यकुमार यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उघडपणे स्तुती केली. त्यांच्या वक्तव्यावरून असा प्रश्न उपस्थित होतो की, हा नवा खेळ सुरू झालाय का? सोशल मीडियावरही कालपासून अशा पोस्ट व्हायरल होत आहेत की, भारतीय संघाने पहलगाम हल्ल्यातील पीडितांसाठी 21 कोटी रुपये दिले. मात्र, ही अफवा असून फक्त सूर्यकुमार यादव यांनी काही लाख रुपये दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनांमधून काही प्रश्न उभे राहतात: सुमारे 24 कोटी रुपये संघाला मिळाले आहेत. सूर्यकुमार यादव यांच्याकडे 35 ते 78 लाख रुपये किंमतीचे विदेशी घड्याळ आहे. त्यांनी काही लाख रुपयांची मदत केल्यावर त्याचा इतका गाजावाजा का केला जातोय? सूर्यकुमार यादवने वापरलेले घड्याळ Jacob & Co. या स्विस कंपनीचे आहे. यावर राम मंदिर, भगवान हनुमान यांची प्रतिमा व “जय श्रीराम” असे लिहिले आहे. हे घड्याळ राष्ट्रवादी भावना प्रकट करते, असे काहींचे म्हणणे आहे. पण त्याच वेळी स्वदेशीचा प्रचार करणाऱ्यांसाठी हे विरोधाभासी ठरते.सूर्यकुमार यादव यांना एकाच मॅचसाठी ४ लाख रुपये मिळतात. म्हणजेच ७ मॅचेससाठी २८ लाख रुपये. दंड वजा केल्यावर त्यांना सुमारे २५–२६ लाख रुपये मिळतात. त्याच वेळी, पहलगाम हल्ल्यात सुमारे ६० लोकांचे प्राण गेले. अशा परिस्थितीत काही लाखांची मदत खरंच पुरेशी आहे का?BCCI ने भारतीय संघाला आशिया कप जिंकल्याबद्दल २१ कोटी रुपयांचे बक्षीस दिले आहे. मिळालेली एकूण रक्कम सुमारे २४.५० कोटी रुपये आहे. पण सूर्यकुमार यादव स्वतःवर डोलताशांप्रमाणे प्रचार करत आहेत आणि पामेरियन मीडिया त्याला गाजावत आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय राजकारणात बरेच घडते आहे: अमेरिकेने भारताला अप्रत्यक्ष धमकी दिली आहे. रशियाने भारताची स्तुती केली आहे. युएन मध्ये इराणने भारताच्या भूमिकेला आव्हान दिले आहे. इजरायलने मिडल ईस्ट संदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर आणि क्रिकेट विजय यांना एकत्र जोडत राष्ट्रवादाचा संदेश दिला आहे का? तसे असल्यास काही प्रश्न विचारले जावेत लागतील: मोदी सरकार क्रिकेटचा वापर करून राष्ट्रवाद उभा करत आहे का? ऑपरेशन सिंदूरचा वापर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे स्थान उंचावण्याचा प्रयत्न होतोय का? हा संपूर्ण प्रयत्न अमेरिकेसह इतर राष्ट्रांना एक संदेश देण्यासाठी आहे का? अमेरिकेचे वाणिज्यमंत्री भारतावर कृषी, संरक्षण, आणि व्यापार उघडण्यासाठी दबाव टाकत आहेत. या पार्श्वभूमीवर, भारताने ऑपरेशन सिंदूर व क्रिकेटच्या माध्यमातून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे का? निष्कर्षतः “ऑपरेशन सिंदूर” आणि “क्रिकेट विजय” यांना जोडत एक नवीन राष्ट्रवाद रचण्याचा प्रयत्न होत आहे काय? हे प्रश्न वाचकांनी स्वतः ठरवावे. संकेतांच्या भाषेपेक्षा आता स्पष्ट आणि थेट उत्तरांची गरज आहे. Kanthak Suryatal Post Views: 664 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation धर्माबाद तालुक्यात एसडीआरएफ मार्फत पुरग्रस्तांचा यशस्वी बचाव दसरा-दिवाळी अन रेल्वेचे वेटिंग तिकीट