नांदेड,(प्रतिनिधी)-पिंपळढव येथील भूमिपुत्र आणि पाकीतांडा (ता. भोकर) येथील जि. प.शाळेचे संवेदनशील शिक्षक पंडित नारायणराव तोटेवाड यांना ‘बालरक्षक कार्यगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य बालरक्षक टीमच्या पुढाकाराने शाळाबाह्य मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येतो. किनो एज्युकेशन सोसायटी मालेगाव व बालरक्षक टीम महाराष्ट्र यांच्यातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष रईस शेख, राठोड, एससीइआरटीच्या माजी सहसंचालिका शोभा खंदारे, सहसंचालक ठाकरे,उपसंचालक तथा साहित्यिक पोपटराव काळे,एससीईआरटी विभाग प्रमुख अरुण जाधव, अकोला शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर आदींच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. विनोद राठोड बालरक्षक यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
More Related Articles
नांदेड जिल्हयातील व्यावसायीक वाद दाखल होण्यापूर्वीच सामोपचाराने मिटविण्यात यश नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची कामगिरी
नांदेड- व्यावसायीक वाद खटल्यापूर्वी मध्यस्थीद्वारे सामोपचाराने मिटविण्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला यश आले असून, जिल्ह्याच्या…
विश्र्वासघात करणाऱ्या पाच पोलीसांना पोलीस उपमहानिरिक्षकांनी निलंबित केले
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी काल अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष…
पंतप्रधानांऐवढेच विरोधी पक्षांनाही महत्व-खा.रविंद्र चव्हाण
नांदेड(प्रतिनिधी)-नुकतेच संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. पण या अधिवेशनात एपस्टीन फाईल्स प्रकरणावरुन गोंधळ माजला होता.…
