ताज्या बातम्या नांदेड

… या तीन पोलीस अंमलदारांशिवाय स्थानिक गुन्हा शाखा चालूच शकत नाही काय?

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतून बदली झालेले तीन पोलीस अंमलदार आजही स्थानिक गुन्हा शाखेत का कार्यरत आहेत यावर कोणीच शोध घेत नाही. गेलेल्या पोलीस अधिक्षकांनी स्थानिक गुन्हा शाखेत पुन्हा नवीन नियुक्त्या केल्या.स्थानिक गुन्हा शाखेतील मुळ पद मंजुर संख्या आणि आजच्या परिस्थितीत या शाखेत हजर असलेल्या पोलीस अंमलदारांची संख्या याचा ताळमेळ कोण लावणार?
पोलीस दलातील व्यक्तींसाठी स्थानिक गुन्हा शाखेत काम करणे ही एक महत्वपुर्ण जागा आहे, सन्मानाची जागा आहे, जीवनाचे महत्व वाढविणारी जागा आहे पण त्यासाठी तेवढाच दम त्या पोलीस अंमलदारामध्ये असणे आवश्यक आहे.या शाखेचे प्रभारी पोलीस अधिकारी अर्थात पोलीस निरिक्षक यांच्या कसबावर सुध्दा या शाखेच्या यशस्वी पणाचे पाये रोवलेले असतात. आजच्या परिस्थितीत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आहेत. त्यांनी डिसेंबर महिना ओलांडला तर सलग 3 वर्ष स्थानिक गुन्हा शाखेचा कार्यभार करणारे मागील दशकातील पहिले पोलीस निरिक्षक ठरतील. अत्यंत कर्तव्यदक्ष, आपल्या कामासाठी अहारात्र मेहनत करणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अंमलदारांसोबत चिखलीकर यांनी सुध्दा भरपूर काही अनुभवलेले असेलच.याच शाखेचा चिखलीकरपुर्वीचा ईतिहासाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर असे दिसते की, त्या काळात स्थानिक गुन्हा शाखेच्या कार्यालयाची अर्थात पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या कक्ष क्रमांक 11 ची सात बारा किंवा मुद्रांक कागदावर विक्री करण्याचे शिल्लक राहिलेले होते. ईतिहास ईतिहास असतो. जीवन हे वर्तमानावर चालते. भविष्याचा अंदाज लावता येतो. परंतू त्यावर स्पष्टपणे दृढ राहुन जगणे अत्यंत अशक्य आहे.
स्थानिक गुन्हा शाखेत तीन पोलीस अंमलदार आहेत त्यांची सध्याची नियुक्ती पुढे कंसात लिहिलेली आहे. ते दशरथ जांभळीकर(जीपीयु), तानाजी येळगे(देगलूर), रविकिरण बाबर (पोलीस मुख्यालय) असे आहेत. स्थानिक गुन्हा शाखेत पोलीस अंमलदारांची संख्या जास्त असतांना सुध्दा या तिघांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी न सोडता आजही ते स्थानिक गुन्हा शाखेत का कार्यरत आहेत याचा उलगढा मात्र होत नाही. आजच्या परिस्थितीत स्थानिक गुन्हा शाखेची मुळ मंजुर पदसंख्या आणि प्रत्यक्षात स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत असलेली संख्या यांचा तुलनात्मक अभ्यास कोण कधी करेल? आणि ज्या पोलीस अंमलदारांची नियुक्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांना का पाठवले जात नाही? तसेच या तीन पोलीस अंमलदारांशिवाय स्थानिक गुन्हा शाखा चालूच शकणार नाही काय? असे अनेक प्रश्न नव्याने उपस्थित होत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *