नांदेड(प्रतिनिधी)-कोरोना आजारामुळे मृत पावलेल्या शेतकर्यांच्या नावे असलेले कर्ज शासनाने माफ करून त्यांच्या कुटूंबियांना आधार द्यावा अशी मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना आजाराच्या संकटकाळात फ्रंट वर्कर म्हणून अनेक घटकांनी काम केले त्या सर्वांची शासनाने व समाजाने नोंद घेतली . परंतु शेतकर्यांकडे मात्र दुर्लक्षच करण्यात आले . लॉकडाऊनच्या काळात सर्व इंडस्ट्री बंद असताना शेतकऱ्यांनी शेती पिकवणे बंद केली नाही त्यानी नफ्या तोट्याचा विचार न करता सर्वांना पुरेल एवढे अन्नधान्य भाजीपाला निर्मिती केली. अशा अन्नदात्या शेतकर्यांना ही कोरोना आजारांमुळे जीव गमवावा लागला. कोरोनामुळे मृत पावलेल्या शेतकर्यांना शासनाची कसल्याही प्रकारची मदत झाली नाही त्यामुळे सरकारने मृत शेतकर्यांच्या नावे असलेले कर्ज माफ करून त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचे काम करावे अशी मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी एक निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी अनुसूचित जातीच्या साहित्यरत्न, लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील निधीमध्ये आर्थिक अनियमितता व भ्रष्टाचार केल्या संदर्भाचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नांदेड दौऱ्यात दिले आहे. शासनाच्या सामाजिक व न्यायविभागाकडून जिल्हा नियोजन समितीकडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी भागासाठी निधी दिला […]
नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेसोबत अत्याचार करून त्या अत्याचाराचे फोटो तुझ्या नातलगांना दाखविल अशी धमकी देवून अनेकदा अत्याचार करणाऱ्या 22 वर्षीय युवकाला तिसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.आर.पटवारी यांनी तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. बारड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 16 वर्षीय बालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा नातलग असलेला माधव काशीनाथ चव्हाण (22) रा.शेंबोली ता.मुदखेड ह.मु.बाबानगर नवा मोंढा […]
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात सकाळी एक एस.टी.गाडी फोडल्यानंतर कटकारस्थान थांबले नाही. सायंकाळी पुन्हा विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयासमोर एका लालपरीवर दगडफेक करण्यात आली. यामुळे एस.टी.बसवर हल्ला करणार्यांना मुळापासून नष्ट करण्याची आवश्यकता ही घटना सांगते आहे. आज सकाळी विष्णुपूरी भागात एका एस.टी.महामंडळाच्या गाडीवर दगडफेक झाली. गाडीचे १५ हजारांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणी व्यक्ती जखमी झाला नव्हता. सायंकाळी ६ […]