नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड-किनवट महामार्गावरील तीन पर्यायी पुल वाहुन गेल्याने या मार्गावरील वाहतुक अनेक तास खोळंबली होती. नदीच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
नांदेड-किनवट-माहूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील तीन वर्षापासून सुरू आहे. बुधवारी रात्री संपुर्ण जिल्ह्यात जोरदार प्रर्जन्यवृष्टी झाली किनवट परिसरात एकाच रात्रीतून 74 मी.मी. पावसाची नोंद आहे. यामुळे यामार्गावरील खैरगाव, चिखलीफाटा, जलधारा येथे राष्ट्रीय महामार्गावर तीन नवीन पुल तयार होत आहेत म्हणून वाहतुकीची पर्यायी सोय करतांना तीन पर्यायी पुल तयार करण्यात आले होते. पण पावसाची जोरदार वृष्टी आणि त्या पर्यायी पुलांमधील ताकत याचा ताळमेळ बिघडला आणि हे तीन पर्यायी पुल वाहुन गेले. त्यामुळे नांदेड-किनवटकडे जाणारी वाहतुक जवळपास 15 तास ठप्प झाली होती. वाहने बाजूला ठेवून प्रवाशी पावसाचा आनंद घेत होते. बाहेर थांबलेले प्रवाशी पावसाच्या वृष्टीमुळे झालेला पुलांचा बोजवारा पाहत उभे होते. अत्यंत जोरदारगतीने या पुलांवरुन पाणी वाहत होते.
